शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

"ते वक्तव्य अजिबात योग्य नाही, पण न्यायाधीश राहिलेल्या माणसाने ते भाषण तिथेच थांबवायला हवे होते.."  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 12:11 IST

शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे.

पुणे : पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित करण्यात आलेल्या एल्गार परिषदेत शरजिल उस्मानी यांनी हिंदू समाजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना प्रक्षोभक भाषण केले होते. हिंदू समाजाचा अवमान केल्याप्रकरणी उस्मानी याच्यावर कडक कारवाई करण्याच्या उद्देशाने भाजपने आक्रमक पावित्रा घेत राज्य सरकार व गृहमंत्री यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. याप्रकरणी पुण्यात शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. शरजील उस्मानीच्या त्या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या जितेंद्र आव्हाड,गृहमंत्री अनिल देशमुख व छगन भुजबळ यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी देखील ते वक्तव्य चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले होते. मात्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एल्गार परिषदेवरून निवृत्त न्यायमूर्ती व एल्गार परिषेदेचे आयोजक बी.जी. कोळसे पाटील यांच्यावर कडक शब्दात निशाणा साधला आहे. 

पुण्यातील एका कार्यक्रमात अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. पवार म्हणाले, शरजिल उस्मानीने केलेलं वक्तव्य अजिबात योग्य नाही. न्यायाधीश राहिलेल्या माणसाने तिथेच ते भाषण थांबवायला हवे होते, अशा कडक शब्दात बी जी. कोळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. मात्र आता याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. त्याचप्रमाणे या प्रकरणाचा तपास देखील महाराष्ट्र पोलीस तपास करत आहेत.

एल्गार परिषदेला परवानगी का दिली या विरोधकांच्या टीकेचा खरपूस समाचार घेताना अजित पवार म्हणाले, कार्यक्रमाच्या ठिकाणी नेमके कोण येणार? काय बोलणार? याची आम्हाला माहिती असते का? असा सवाल उपस्थित केला. 

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे पोलीस परवानगीनुसार एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती.  या कार्यक्रमात आयोजकांनी अलिगड मुस्लिम विद्यापीठातील शरजिल उस्मानी यांना भाषण देण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये  आपल्या भाषणात त्यांनी भारतीय संघराज्य व हिंदूंविरोधात अत्यंत आपत्तीजनक व भडकावू विधाने केली, हिंदू समाज सडलेला आहे असे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे व दोन समाजात धार्मिक तेढ निर्माण करणारे विधान केली होती. 

धनंजय मुंडे यांच्या प्रकरणावर अजित पवारांनी दिली ही प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांच्या मुलांचे पोलिसांनी काल जबाब घेतले आहेत. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप करणार नाही. पोलीस तपास पूर्ण होईपर्यंत या प्रकरणावर काहीही बोलता येणार नाही अशी सावध प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. 

पुणे महापालिका निवडणूक गनिमी काव्याने लढणारपुणे महापालिकेची निवडणूक गनिमी काव्याने लढणार आहे. सासूचे दिवस संपले, सुनेचे दिवस आलेत, त्यानुसार लोक विचार करतील. महापालिका निवडणुकीत मतांची विभागणी होऊ नये. शिवसेना, काँग्रेस आणि शिवसेना नेत्यांशी चर्चा करणार आहे. ग्रामपंचायत सारखच यश महापालिका निवडणुकांमध्ये मिळेल अशी खात्री आहे. 

 

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारElgar morchaएल्गार मोर्चाSwargateस्वारगेटPoliceपोलिसHinduहिंदू