शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
5
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
6
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
7
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
8
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
9
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
10
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
11
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
12
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
15
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
16
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
17
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
18
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
19
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
20
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  

Aditya Thackrey: आमचं सरकार आलं कि दोषींवर कारवाई करू; आदित्य ठाकरे, पुणे पूरग्रस्त भागात पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 4:36 PM

पूरग्रस्त भागातील लोकांचा संसार वाहून गेला, त्यांना योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? आदित्य ठाकरेंचा सवाल

पुणे : पुण्यात मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यावेळी मर्यादेपेक्षा जास्त पाणी सोडण्यात आले. त्या रात्री जलसंपदा विभागाने इशारा देऊनही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगरी, निंबजनगर, विठ्ठलवाडी भागातील जवळपास  चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली. पुणे महापालिका आणि जलसंपदा विभाग दोघांमध्ये समन्वय नसल्याचे सिद्ध झाले. यात झालेल्या अताेनात नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप पुणेकरांनी केला.  त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सिंहगड रोड भागातील नागरिकंना भेट दिली. तर आज माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या भागाची पाहणी कारण्याबरोबरच तेतेहील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनीसुद्धा प्रशासनावर टीका केली आहे. 

      आदित्य ठाकरे म्हणाले, पाणी सोडलं तेव्हा न सांगता सोडल गेलं. तेही कित्येक जास्त पटीने सोडलं गेलं. त्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मी आता लोकांशी संवाद साधला. त्यांचे कपडे, घरातील वस्तू वाहून गेल्या आहेत. त्याची योग्य ती नुकसानभरपाई मिळेल का? असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. डोळयादेखत, नदीपात्रात राडारोडा टाकला जातोय. नदीपात्र साठी गुजरात मॉडेल वापरलं जातंय. साबरमती मॉडेल कॉपी पेस्ट करून नदी सुधार प्रकल्प करणार आहेत आहेत. हे चुकीचं वाटत आहे. यासंदर्भात मी प्रेझेंटेशन यापूर्वी दिलेलं होतं. नदी सुधारला विरोध नाही पण मी स्थगिती दिली होती.  त्यातील त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. या पूरपरिस्थितीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आमचं सरकार आलं की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई आम्ही करू असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून प्रश्न सुटणार नाहीत त्यासाठी प्लॅन ऑफ ॲक्शन गरजेचे असल्याचे ते यावेळी म्हणाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAditya Thackreyआदित्य ठाकरेfloodपूरRainपाऊसWaterपाणीDamधरणMahavikas Aghadiमहाविकास आघाडीMahayutiमहायुती