शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

By admin | Published: June 28, 2015 12:31 AM

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.

पुणे : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आता दि. २ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या,तसेच बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेंतर्गत बुधवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत ५५ हजार २० विद्यार्थ्यांना स्थान मिळाले होते. या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, या कालावधीत ४१ हजार ८०५ विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर, १२ हजार ९३३ विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. प्रवेश निश्चित न केल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यांना आता यापुढे आॅनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. तसेच जातप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला न देऊ शकलेल्या १५६ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. तर, १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली.विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संधी असेल. या शाखेतील ५ हजार २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तसेच वाणिज्य मराठीला ३२८४, तर वाणिज्य इंग्रजीला २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. कला शाखेच्या मराठी व इंग्रजीसाठीही अनुक्रमे १०२६ व ३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणांच्या जवळपास असलेल्या व संबंंधित महाविद्यालयाचा पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत वरचे महाविद्यालय मिळू शकेल.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित होऊनही प्रवेश घेतला नाही, ते विद्यार्थी या प्रक्रियेतून आपोआपच बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असावा किंवा त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील. दर वर्षीच अशाप्रकारे विद्यार्थी यादीत नाव असूनही प्रवेशाकडे पाठ फिरवतात.- रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक