शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

Pandharpur Wari : आषाढी वारी सोहळ्यात आणखी शिथिलता आणण्याचा विचार सुरु : उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 15:47 IST

मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

पुणे : आषाढी वारीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतला आहे.आणि त्याचे आदेश देखील काढण्यात आला आहे. वारी आणि वारकरी समाजाबाबत आम्हाला आदर व प्रेमच आहे. परंतु, सध्याची कोरोना परिस्थिती देखील लक्षात घेणे गरजेचे आहे. मागील वर्षीच्या वारी इतकं कडक पण नाही आणि एकदम मोकळीकसुद्धा न देता त्यात मध्यम मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. 

पुण्यात उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात कोरोना आढावा बैठक झाली. या बैठकीला लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.

पवार म्हणाले, पायी वारीबाबत निर्णय घेण्याआधी देहू,आळंदीसह इतर मानाच्या प्रमुख पालख्यांच्या प्रमुखांशी आम्ही चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानंतर एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना वारी सोहळ्यासाठी आवश्यक ती सगळी तयारी करण्यास सांगितले आहे. यावेळी लोकप्रतिनिधी,प्रशासन यंत्रणा किंवा वारी मार्गावरील ग्रामस्थांनी कोरोना परिस्थितीमुळे पायी वारी सोहळ्याऐवजी मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत बसने वारी सोहळा आयोजित करण्याची मागणी केली आहे. तसेच पंढरपूर येथील प्रशासन यंत्रणांनी देखील कोरोना प्रतिबंधक लसींचे दोन डोस झालेल्यांनाच पंढरपूरमध्ये प्रवेश देण्यात येईल असा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यानंतर सुद्धा वारी सोहळ्याबाबत ताणाताणी सुरु आहे. याबाबत वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची चर्चा सुरु असून या परिस्थितीत आषाढी वारीबाबत काही मध्यम मार्ग निघू शकतो यावर विचार सुरु आहे. 

राजगड रोपवेला विरोध करणाऱ्यांना अजित पवारांनी सुनावलं 

सिद्धटेक जीर्णोद्धार असो किंवा रायगड रोप वे याकामांना देखील सुरुवातीला विरोध झाला. मात्र कोणताही निर्णय घेताना तो सर्वसमावेशक असावा याचा विचार केलेला असतो. कधीतरी वयोवृद्ध माणसांना देखील शिवाजी महाराजांच्या इतिहास जाणून घेण्याकरिता ऐतिहासिक गड किल्ल्यांना भेटी द्याव्या वाटतात.त्यांच्यासाठीच रोपवेचा पर्याय आहे.पण एक लक्षात घेतले पाहिजे, आज जे राजगड रोपवेला विरोध करत आहे किंवा चढून गडांवर जात आहे. कधीतरी ते सुद्धा ६० वर्षांचे होणार आहे. तरीसुद्धा ज्यांचा विरोध आहे. त्यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असे अजित पवारांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPandharpur Wariपंढरपूर वारीcorona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे