शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

शेतकऱ्यांना २६ हजार कोटींची भरपाई द्या; कृषी विभागाचा राज्य सरकारला प्रस्ताव

By नितीन चौधरी | Updated: August 18, 2022 15:15 IST

सर्वात कमी पाऊस सांगलीत...

पुणे : गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विदर्भात तसेच मराठवाड्याच्या अनेक भागांत अतिवृष्टी झाली असून, राज्यात तब्बल १८ लाखांहून अधिक हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. लाखो हेक्टर शेती पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगाम गेल्यात जमा आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीनुसार जुलैतील नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे २६०० कोटींची नुकसान भरपाई द्यावी, असा प्रस्ताव कृषी विभागाने दिला आहे.

नागपूर विभागात सर्वाधिक

राज्यात मान्सून जुलैत दमदार बरसल्यानंतर ऑगस्टमध्येही धुवाधार बरसला. याचा सर्वाधिक फटका विदर्भाला बसला आहे. विदर्भातील नागपूर विभागात आजवरच्या सरासरीच्या १६१ टक्के पाऊस झाला आहे. जून ते १६ ऑगस्टची सरासरी ७२८.९ मिमी असून, येथे आतापर्यंत ११७७.६ मिमी पाऊस झाला आहे. तर अमरावती विभागातही अतिवृष्टी झाली असून, तेथे सरासरी ५०६.८ मिमी असून, प्रत्यक्षात ६६० मिमी पाऊस झाला आहे. हा पाऊस सरासरीच्या १३० टक्के झाला आहे. औरंगाबाद विभागात १३५.७ तर नाशिक विभागात ११३.५ टक्के पाऊस झाला आहे. मात्र, कोकणात सरासरी इतका अर्थात १०४.६ टक्के, तर सर्वात कमी ९५.६ टक्के पाऊस झाला आहे. पुणे विभागाची सरासरी ६५३ मिमी असून, येथे प्रत्यक्षात ६२४.६ मिमी पाऊस झाला.

सर्वात कमी पाऊस सांगलीत

पुणे विभागात सांगली जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस अर्थात सरासरीच्या ७७ टक्के पाऊस झाला आहे. त्यानंतर धुळ्यात ९३.२, रायगड ९७.९, तर रत्नागिरीत ९९.३ टक्के पाऊस झाला आहे.

सुमारे २३ लाख शेतकऱ्यांना फटका

कृषी विभागाने जुलैत झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण केले आहेत. त्यानुसार २२ लाख ८८ हजार ८६० शेतकऱ्यांचे तब्बल १८ लाख २१ हजार ४०३ हेक्टरवरचे नुकसान झाले आहे. पूर्वीच्या एनडीआरएफच्या निकषांनुसार सुमारे १२९६ कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची शिफारस करण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने मंगळवारी बदललेल्या निकषांनुसार ही रक्कम आता दुप्पट अर्थात २६०० कोटी रुपये झाली आहे.

ही भरपाई जुलैमध्ये झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यानुसार आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत ८० हजार हेक्टर नुकसान झाल्याचे प्राथमिक तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यात आणखी वाढ होईल. मात्र, खरिपात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या हातातील हंगाम वाया गेला आहे. त्यांना आता रब्बी हंगामावरच अवलंबून राहावे लागेल.

- विकास पाटील, कृषी संचालक, पुणे

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्र