शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पुणे कॅन्टोनमेंट बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्या, केंद्र व राज्य सरकारला हायकोर्टाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 06:19 IST

कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.

मुंबई  - कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी देशभर नेटाने उपाययोजना केल्या जात असताना पुणे कॅन्टोनमेंट बोर्डाकडे हे उपाय तर सोडाच; पण कर्मचाऱ्यांचे पगार द्यायलाही पैसे नाहीत, असे सांगण्यात आल्यानंतर केंद्र व राज्य सरकारने या बोर्डास तातडीने एक कोटी रुपये द्यावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी दिला.केंद्र सरकारकडून ‘जीएसटी’च्या बदल्यात मिळायची भरपाईची रक्कम वेळेवर न मिळाल्याने कॅन्टोनमेंट बोर्डाची ही स्थिती आली आहे. तातडीची गरज म्हणून पैसे कोणी द्यायचे यावरून केंद्र व राज्य सरकारने जबाबदारी परस्परांवर ढकलण्याची भूमिका घ्यावी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत न्या. एस. जे. काथावाला व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.पुणे महापालिकेस ‘जीएसटी’ भरपाईचे ५०० कोटी रुपये लगेच दिले जावेत यासाठी तेथील एक नागरिक अतुल विनायक गायकवाड यांनी केलेल्या याचिकेवरील सुनावणीत हा विषय उपस्थित झाला. कोरोनाचे काही रुग्ण कॅन्टोनमेंट बोर्डाच्या हद्दीत आढळले. पण तेथे काही सोय नसल्याने या रुग्णांना पुण्यात यावे लागते. कॅन्टोनमेंट बोर्डास ५ मार्च रोजी यासंबंधी पत्रही लिहिले, असे याचिकाकर्त्यांचे वकील श्रीनिवास पटवर्धन यांनी निदर्शनास आणले. यातून मार्ग काढण्यासाठी खंडपीठाने अ‍ॅडव्होकेट जनरल आशुतोष कुंभकोणी व अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांना मुद्दाम पाचारण केले.बोर्डास नागरी सुविधांसाठी पैसे हवे आहेत, पण म्हणजे काय हे नेमके स्पष्ट नाही. पैसे देता येणार नाहीत, असे अनिल सिंग यांचे म्हणणे होते. अ‍ॅडव्होकेट जनरल म्हणाले की, बोर्डाचे क्षेत्र चहुबाजूंनी पुणे महापालिकेने वेढलेले असल्याने अशा आणिबाणीच्या वेळी राज्य सरकार हद्दीची सबब सांगून बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांना वाºयावर सोडणार नाही. मात्र उचलून पैसे देण्यापेक्षा पुणे महापालिका कोरोना उपायांसाठी आपली यंत्रणा बोर्डाला उपलब्ध करून देईल, असे त्यांचे म्हणणे होते. बोर्डाचे ज्येष्ठ वकील आर. एस. जहागिरदार यांनी बोर्डाला २.३ कोटी रुपये, कोणत्याही खात्यावर लगेच दिले जावेत. बोर्ड त्याच्या खर्चाचा हिशेब देईल, अशी विनंती केली.शेजाऱ्यांची कणव, आप्त वा-यावरशेजारी देशांवर जेव्हा आपत्ती येते तेव्हा त्यांना मदत करण्यासाठी भारत नेहमीच पुढे सरसावतो. पण आता कोरोना या महामारीचे संकट संपूर्ण जगावर आलेले असताना आपल्याच देशातील लोकांना मदत करण्यात केंद्र व राज्य सरकारांनी चालढकल करावी, हे शोभनीय नाही, असे म्हणत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

टॅग्स :Courtन्यायालयpune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड