शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली! सूरज चव्हाण 'बिग बॉस मराठी'चा महाविजेता; अभिजीत सावंतचं स्वप्न भंगलं
2
IND vs BAN : फक्त ७१ चेंडूत खेळ खल्लास! Hardik Pandya चा स्वॅग; सिक्सर मारत फिनिश केली मॅच
3
उद्धव ठाकरे यांची मुलावर टीका; एकनाथ शिंदे भडकले, म्हणाले…
4
बारामतीच्या लेकाने बिग बॉस जिंकले! सूरज चव्हाणसाठी अजित पवारांच्या पत्नीची पोस्ट, म्हणाल्या- "पहिल्या दिवसापासून..."
5
बेरोजगारी दूर झाली तर आरक्षणाचा एकही प्रश्न उभा राहणार नाही; पृथ्वीराज चव्हाण यांचे मत
6
Bigg Boss 18: ९० च्या दशकातील हिरोईन शिल्पा शिरोडकरची एन्ट्री, सलमान म्हणतो, 'इथे कुठे आली तू...?'
7
Bigg Boss Marathi Season 5: रनर अप ठरल्यानंतर अभिजीत सावंतची पोस्ट, म्हणाला...
8
प्रयागराजमधील महाकुंभदरम्यान मांस आणि मद्यविक्रीवर बंदी, मुख्यमंत्री योगींचा मोठा निर्णय
9
"8 ऑक्टोबरनंतर बिहारमध्ये राजकीय भूकंप"! NDA संदर्भात आरजेडी नेत्याची मोठी भविष्यवाणी 
10
३ वर्षांनी कमबॅक! आधी Varun Chakravarthy च्या नावे लाजिरवाणा विक्रम; मग सोडली छाप
11
Bigg Boss Marathi Season 5: टॉप ३ च्या शर्यतीतून 'हा' सदस्य बाहेर, कुटुंबाच्या उपस्थितीत झालं एलिमिनेशन
12
INDW vs PAKW : पाक विरुद्ध विजयी जल्लोष! हरमनप्रीत ब्रिगेडनं पुन्हा मारलं मैदान
13
भारतीय महिलांनी पाकिस्तानला दिला 'जोर का झटका'; क्रिकेटच्या देवाने केलं 'नारीशक्ती'चे कौतुक
14
रामराजेंनी घेतली शरद पवारांची भेट?; रणजीतसिंह निंबाळकरांचा खळबळजनक दावा
15
नवा फास्टर किंग Mayank Yadav ची दाबात एन्ट्री; असा पराक्रम करणारा तिसरा गोलंदाज
16
बंगालमध्ये पुन्हा बलात्कार अन् हत्या; आरोपीला 3 महिन्यांत फाशीची शिक्षा, ममतांचा अल्टिमेटम
17
9 चिमुकल्यांची शिकार करणाऱ्या लांडग्यांची दहशत संपली; शेवटचा लांडका मृतावस्थेत आढळला
18
हरियाणात कसं स्थापन होणार भाजप सरकार? नायब सैनी यांनी सांगितला पुढचा प्लॅन, म्हणाले...
19
पाकिस्तानात काहीही होऊ शकतं... आता थेट मुख्यमंत्रीच झाले बेपत्ता, नक्की प्रकरण काय?
20
कुणासोबत डिनर करायला आवडेल किम जोंग की जॉर्ज सोरोस? जयशंकर यांचं उत्तर ऐकून टाळ्यांचा कडकडाट; बघा Video

लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाची पावती नकोय; खापर पणतू स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 9:13 PM

समाधीसाठी लोकमान्यांनी काय केलं ते सर्वांना माहित्येय; टीकाकारांना कुणाल टिळकांचं उत्तर

पुणे: लोकमान्य टिळक यांच्या कामाला कोणाचीच पावती नको. कोणी ती द्यायचा प्रयत्नही करू नये. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी टिळकांच्या हृयातीत बांधली गेली नसेल. मात्र समाधी व्हावी यासाठी त्यांनी कायकाय केले ते मराठी जनतेला आजही चांगलेच माहिती आहे, अशा शब्दात लोकमान्यांचे खापर पणतू कुणाल टिळक यांनी समाधीवरून सुरू असलेल्या राजकारणाला उत्तर दिले.औरंगाबादच्या सभेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रायगडावरील समाधी लोकमान्य टिळकांनी बांधली असे वक्तव्य केले. त्यावर रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत लोकमान्य टिळकांचा काहीही संबध नाही, तसेच त्यासाठी निधी जमा करून टिळकांनी त्याचा वापरच केला नाही अशी टीका समाजमाध्यमांमधून होते आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही त्यावर टिळकविरोधी भाष्य केले.कुणाल टिळक लोकमान्य टिळकांचे खापण पणतू आहेत. आमदार मुक्ता टिळक यांचे ते पुत्र असून भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे शहर उपाध्यक्ष आहेत. ते म्हणाले, भाजपाचा म्हणून नाही तर टिळक कुटुंबाचा एक घटक म्हणून मी याचा प्रतिवाद करतो. टीका करणाऱ्यांनी आधी इतिहासाचे वाचन करणाऱ्याला प्राधान्य द्यावे. लोकमान्य टिळकांनीच समाधीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी निधी जमा केला. काँग्रेसच्या अधिवेशनात त्यांनीच सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना छत्रपती शिवाजी महाराज हे कसे स्वातंत्ऱ्यांची प्रेरणा आहेत याबद्दल सांगितले. शिवजयंतीला सार्वजनिक स्वरूप दिले ते लोकमान्यांनीच. या सर्वच गोष्टींना पुरावे आहे व टीका करणाऱ्यांनी त्याचा अभ्यास करावा व मगच बोलावे.लोकमान्य टिळकांच्या कामाला कोणाच्या पावतीची गरज नाही, मराठी माणसांच्या मनात टिळकांना कायमच आदराचे स्थान आहे, ते तसेच राहिल, कोणाच्या टिकेने त्याला काहीही धक्का लागणार नाही असे कुणाल म्हणाले.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळक