शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे जेथे गेले, तेथे अशांतता..."; इंडोनेशियातील लोकांचा रोहिंग्या मुस्लिमांना विरोध, बोटीतून उतरूही दिलं नाही
2
भारताशी पंगा घेणाऱ्या कॅनडाच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात; पक्षाच्या खासदारांनीच मागितला राजीनामा
3
काँग्रेस या मतदारसंघात ठाकरेंच्या शिवसेनेला मैत्रीपूर्ण लढत देणार; बंडखोरीचा सांगली पॅटर्न राबविण्याची तयारी
4
IND vs NZ: न्यूझीलंडची प्रथम फलंदाजी; टीम इंडियात ३ मोठे बदल, स्टार खेळाडूचं साडेतीन वर्षांनी 'कमबॅक
5
शिंदे विमानात, निरोपाची गल्लत अन् दिल्लीत न झालेली बैठक; दोन उपमुख्यमंत्री राजधानीत मुक्कामी
6
कर्तव्यचुकार पोलिसांवर काय कारवाई केलीत? बदलापूर अत्याचार प्रकरणी न्यायालयाची विचारणा
7
काळवीटाच्या शिकारीनंतर सलमानने बिश्नोई समाजाला दिलेली पैशांची ऑफर? लॉरेन्सच्या भावाचा मोठा खुलासा, म्हणाला...
8
Stock Market Opening: शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीची संमिश्र सुरुवात; हिंदाल्को, HUL मध्ये मोठी घसरण
9
Diwali 2024 लक्ष्मी पूजन ३१ ऑक्टोबर की ०१ नोव्हेंबरला? तारखेबाबत संभ्रम; पाहा, शुभ मुहूर्त
10
Priyanka Gandhi Networth : शेतजमीन, पीपीएफ, म्युच्युअल फंड्स; प्रियांका गांधींची गुंतवणूक नक्की कुठे-कुठे; किती कोटींच्या मालकीण?
11
सीमेवरील शांततेला प्राधान्य द्यायला हवे; PM मोदी यांनी जिनपिंग यांच्यासमोर व्यक्त केली अपेक्षा
12
सुनियोजित शहरातील बेकायदा बांधकामे वाढू कशी देता? मुंबई उच्च न्यायालयाचे खडे बोल
13
लेक ट्विंकलसोबत फोटो काढण्यास डिंपल कपाडियांचा नकार, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले- "जया बच्चन..."
14
बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट जूनमध्ये शिजला होता; अकराव्या आरोपाली ठोकल्या बेड्या
15
आजचे राशीभविष्य : प्रवास किंवा सहलीची शक्यता, आज काही आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता
16
दिवाळी स्पेशल!! ब्रुनो, कुकी, मिश्टी, मायलोच्या अंगावर दिसणार ब्लेझर, जॅकेट अन् फ्रॉक
17
गुरुपुष्य योग: स्वामी महाराजांच्या पूजेनंतर आवर्जून म्हणा प्रदक्षिणा अन् आरती गुरुवारची
18
राज'पुत्रा'समोर दोन्ही सेनेचे आव्हान; अमित ठाकरेंची माहीममधील लढत रंगतदार होणार!
19
धनत्रयोदशीला धनवर्षाव: ९ राजयोग, ९ राशींवर लक्ष्मी प्रसन्न; ऐश्वर्य, वैभवाचे वरदान, शुभ-लाभ!
20
फॉर्म्युल्यात ८५चे समान 'चित्र'! प्रत्यक्षात काँग्रेस १०३, उद्धवसेना ९४, शरद पवार गट ८४!

सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जातीये; शरद पवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 11:11 AM

देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे वारंवार प्रयत्न

पुणे : सध्या देशात असत्याचा मार्ग अवलंबून राजकीय, सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. सत्य मांडणाऱ्या लोकांवर सूडबुद्धीने कारवाई केली जात आहे. फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी सत्यशोधक आंदोलनाची प्रासंगिकता राष्ट्रीय पातळीवर आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले.

‘भारतमुक्ती मोर्चा’च्या वतीने सत्यशोधक समाज स्थापनेच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त सत्यशोधक संमेलनाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बाेलत होते. मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड, प्रतिभा उबाळे, सचिन बनसोडे, संगीता शिंदे आदी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, बहुजन समाजाला धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. महात्मा फुलेंनंतर सावित्रीबाई फुले, मुक्ता साळवे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भास्करराव जाधव, भाई माधवराव बागल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, केशवराव जेधे, दिनकरराव जवळकर इत्यादी अनेकांनी हे वैचारिक आंदोलन पुढे सुरू ठेवले. आपण आधुनिक विचारांचा पुरस्कार केला पाहिजे. पुरोगामी विचारांसाठी आमच्या सगळ्यांची साथ अखंड राहील.

वामन मेश्राम म्हणाले, सत्यशोधक समाजातून उभ्या राहिलेल्या आंदोलनातून संविधानाला सामाजिक आशय लाभला आहे. ही विचारधारा संविधानाने मान्य केली. त्यातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखे नेतृत्व पुढे आले. समता, बंधुता या तत्त्वांवर समाजाची पुनर्बांधणी आवश्यक आहे. देशात संसदीय लोकशाही आली आहे. पण ती खरी लोकशाही नाही. देशात सर्वसमावेशक लोकशाही प्रस्थापित होईपर्यंत समता मूल्य प्रस्थापित होणार नाहीत. त्यासाठी सत्यशोधक आंदोलन पुन्हा नव्या जोमाने उभारावे लागेल.

बाबा आढाव म्हणाले, नव्या संसदेत खासदारांना राज्यघटनेची प्रत दिली. त्यात समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता शब्द नाही. ही घोर लबाडी असून, त्यावरून दिशा ओळखा. पक्षामध्ये मतभेद आहेत; पण देश म्हणून एकत्र या.’

लक्ष्मण माने म्हणाले, सत्यशोधक समाजाच्या पुनरुज्जीवनाची गरज आहे. त्यासाठी पुन्हा आंदोलन उभे करण्यात येईल. शरद पवार आणि वामन मेश्राम यांनी एकत्र येऊन राज्य व देशासाठी काहीतरी केले पाहिजे. पुन्हा वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन होऊ द्यायचे नाही. ब्राह्मणेत्तर एकही मत भाजपकडे जाता कामा नये.

 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारPoliticsराजकारणIndiaभारतSocialसामाजिकNCPराष्ट्रवादी काँग्रेस