शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Chandrashekhar Bawankule: विधानसभेसाठी भाजप अन् महायुतीचा आकडा लोकच काय ते ठरवतील - चंद्रशेखर बावनकुळे

By राजू इनामदार | Updated: July 16, 2024 18:22 IST

संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत

पुणे: महायुतीत भारतीय जनता पक्ष हाच मोठा भाऊ आहे, मोठ्या भावाला अनेक भूमिका वठवाव्या लागतात. कार्यकर्त्यांचे काम सरकार आणायचे असते, त्यानंतर सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण हे नेत्यांनी ठरवायचे असते असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. लोकसभेसाठी ४०० पार चा नारा होता, आता विधानसभेसाठी किती हे सांगायचे मात्र बावनकुळे यांनी यावेळी टाळले.

भाजपच्या प्रदेश विस्तारीत कार्यकारिणीचे अधिवेशन २१ जुलैला पुण्यात होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी बावनकुळे पुण्यात आले होते. अधिवेशनाची माहिती दिल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना बावनकुळे यांनी लिलया उत्तरे दिले, मात्र विधानसभेसाठी भाजप किती व महायुती किती हा आकडा सांगण्याचे त्यांनी टाळले. लोकच काय ते ठरवतील असे ते म्हणाले. महायुतीतील सर्वच पक्षांना त्यांची राजकीय शक्ती वाढवण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे ते कार्यक्रम राबवतात, महायुती म्हणून आम्ही एकत्रच आहोत व सर्व पक्षाचे नेते एकत्र बसून जागांचा निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले. पक्षाचे राज्य पदाधिकारी विजय चौधरी, माधव भंडारी तसेच राजेश पांडे, पक्षाचे शहराध्यक्ष धीरज घाटे यावेळी त्यांच्यासमवेत उपस्थित होते.

भाजप राज्यात ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान संवाद यात्रा काढणार आहे. सर्व म्हणजे २८८ विधानसभा मतदारसंघात पक्षाचे २० नेते जातील, कार्यक्रम घेतील. मतदारांबरोबर बोलतील असे त्यांनी सांगितले. लोकसभेत महाविकास आघाडीने खोटारडेपणा केला. संविधान बदलण्यात येणार यासारखा प्रचार केला. आम्ही केंद्र सरकार, राज्य सरकारने केलेली कामे सांगितले. त्यांचा खोटेपणा उघड करण्यात आम्ही कमी पडलो. मात्र आता तसे होणार नाही. केंद्र व राज्यात असे दोन्हीकडे एकच सरकार असले की कशी कामे होतात हे राज्यातील जनता पहात आहे. उद्धव ठाकरे सरकारने केंद्राच्या ८ योजना राज्यात बंद करून ठेवल्या. मागील दोन वर्षात आम्ही सरकारच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या, त्या राबवल्या, त्याचीच माहिती आम्ही जनतेत जाऊन देऊ असे बावनकुळे म्हणाले.

अधिवेशनाला पक्षाचे ५ हजारपेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित असतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अन्य अनेक नेते अधिवेशनाला उपस्थित असतील. पक्षाची आगामी दिशा, धोरणे यावर पक्षात मंथन होईल. विधानसभेच्या निवडणुकांसाठी शाह मार्गदर्शन करतील असे बावनकुळे यांनी सांगितले. संवाद यात्रेच्या माध्यमातून महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत पांघरलेला खोटेपणाचा बुरखा आम्ही फाडणार आहोत असे ते म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेMahayutiमहायुतीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा