शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यात ‘आव्वाज’ कुणाचा? उद्धवसेना वि. शिंदेसेना जुगलबंदी; गर्दीचा उच्चांक कोण मोडेल?
2
पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्यास जरांगेंचे आव्हान; भगवान भक्तिगडावर मुंडे; नारायणगडावर पाटील
3
युद्धाने समस्या सुटणार नाहीत, शक्य तितक्या लवकर शांतता, स्थिरता पुनर्स्थापित करावी: PM मोदी
4
टाटा ट्रस्टची धुरा नोएल टाटांकडे; उत्तराधिकारी निवडला, ‘टाटा ट्रस्ट्स’च्या चेअरमनपदी निवड
5
उड्डाणानंतर विमानात बिघाड, काही तास घिरट्या, सुखरूप लॅंडिंग; पायलटमुळे प्रवाशांचे प्राण वाचले
6
सीमेपलीकडून १५० दहशतवादी भारतात घुसखोरीच्या तयारीत; सुरक्षा दलांना अधिक सतर्कतेचा इशारा
7
फ्लाइट अन् फाइटसाठीही तयार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधानसभेसाठी सज्जतेचे संकेत
8
निवडणुकीच्या तोंडावर ‘सोशल इंजिनीअरिंग’; विविध समाजांसाठी महामंडळे स्थापन करण्याचा सपाटा
9
‘लाडक्या’ योजना हव्या, तर मत द्या; विकासासाठी पुन्हा महायुती सरकार आणावे लागेल: CM शिंदे
10
राजेगटाचं ठरलं! बंधू संजीवराजे ‘तुतारी’ घेणार; रामराजे महायुतीचा प्रचार करणार नाहीत
11
“राजकारणात बजबजपुरी, आता कोण कुठे असेल काही सांगता येत नाही”: संभाजीराजे
12
“हरयाणात जे घडले ते महाराष्ट्रात कदापि घडणार नाही, कारण...”: प्रणिती शिंदे
13
रिपाइंला ८ ते १० जागा हव्यात; निवडणूक आमच्याच चिन्हावर लढणार: रामदास आठवले
14
भाजप नेते अजित पवार यांना साइड ट्रॅक करताहेत; विजय वडेट्टीवार यांचा आरोप
15
महादेव ॲप प्रवर्तक चंद्राकरला अखेर बेड्या; दुबईत अटक, लवकरच होणार प्रत्यार्पण
16
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
17
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
18
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
19
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
20
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?

पाच हजार शेतकऱ्यांना पीकविम्याचा लाभ

By admin | Published: July 08, 2015 1:39 AM

खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे,

राजगुरुनगर : खेड तालुक्यात २०१४-२०१५ या वर्षात पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना २ कोटी ३८ लाख रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण होटकर यांनी दिली. एकूण साडेपाच हजार शेतकऱ्यांना या विमा योजनेचा लाभ मिळाला आहे. गेल्या वर्षी दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत प्रामुख्याने कृषी खात्याच्या वतीने जिल्हा बँकेच्या माध्यमातून पीक-कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा उतरविला होता. गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने आणि जेव्हा झाला तेव्हा अवकाळी झाल्याने भातपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पण बहुतांश भात उत्पादकांनी विमा घेतला असल्यामुळे त्यांना नुकसानभरपाई मिळाली आहे. भात पिकाला मिळालेल्या नुकसानभरपाईची रक्कम २ कोटी ३४ लाख आहे. इतर पिकांना त्या तुलनेत कमी नुकसानभरपाई मिळाली. गेल्या वर्षी एकूण १७ लाख ६५ हजार रुपये विम्याच्या हप्त्यापोटी भरले गेले होते. भाताला हेक्टरी १५ हजार ४०० रुपये विमा संरक्षण होते, तर हेक्टरी ३८५ रुपये विम्याचा हप्ता होता. प्रत्येक पिकाला वेगवेगळी विमा संरक्षण रक्कम असते. (वार्ताहर)स