शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदनगर जिल्हा बँकेने नोकर भरतीत आरक्षण वगळले; वाद पेटणार?
2
अंबाजोगाई - लातूर रोडवर भीषण अपघात; लातूर जिल्ह्यातील ४ जण जागीच ठार
3
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; बजरंग सोनवणेंचं मुख्यमंत्री अन् राज्यपालांना पत्र, म्हणाले...
4
सिनेट निवडणूक मंगळवारी होणार; सरकारच्या परिपत्रकाला स्थगिती
5
जगन्नाथ मंदिराच्या तळघरात गुप्त खजिन्याचा घेणार शोध; लेझर स्कॅनिंगचा वापर
6
परतीचा पाऊस देणार महामुंबईला तडाखा; २६ ते २९ सप्टेंबर मुसळधारेचा अंदाज
7
१४ दिवसांतच संग्राम चौगुलेची 'बिग बॉस मराठी'मधून एक्झिट, पोस्ट शेअर करत म्हणाला- "मला..."
8
स्वाभिमानी मणका तंदुरुस्त करून घ्या!; राज ठाकरेंची पुन्हा मराठी माणसांना हाक
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: महत्त्वाचा निर्णय घेण्यास दिवस अनुकूल नाही!
10
याही वेळी मुंबईत अपक्षांची संख्या लक्षणीय असणार? इच्छुकांमध्ये तिकिटासाठी रस्सीखेंच
11
पाकिस्तान मोदींना घाबरतो; आज पाकिस्तान गोळीबाराची हिंमतही करणार नाही
12
राष्ट्रवादीचे कार्यालय शरद पवार गटाचेच; लोकसभा सचिवालयाने दिले स्पष्टीकरण
13
तिरूपती लाडूबाबत अफवा पसरवणाऱ्यांवर गुन्हा; भेसळयुक्त तूप ‘अमूल’चे असल्याच्या पोस्ट
14
मुख्य निवडणूक आयुक्त ३ दिवस मुंबई दौऱ्यावर; विधानसभा निवडणुकीसाठी घेणार बैठका
15
भारतातील चाकरमानी दबले फायलींच्या ढिगाऱ्याखाली; ६१ टक्के जण आठवड्याला ४९ तासांपेक्षा अधिक राबतात
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेत दाखल, ‘क्वाड’ शिखर परिषदेत सहभागी होणार
17
आता मेडिकलच्या ‘पीजी’च्या जागा वाढणार; वैद्यकीय आयोगाने अर्ज मागविले
18
वरिष्ठांना लाच देण्याचा कनिष्ठाचा प्रयत्न; ‘प्रॉव्हिडंट फंड’ची सीबीआयकडे तक्रार
19
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
20
आम्हाला दिलेल्या आश्वासनांचे काय झाले? निवासी डॉक्टरांचा सवाल

स्थानिक भूमिपुत्रांना कायम नोकरी द्या!

By admin | Published: January 06, 2016 12:47 AM

बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते;

बारामती : बारामती एमआयडीसीसाठी शेतजमिनी संपादित करताना शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरी दिली जाईल, असे आश्वासन दिले होते; मात्र स्थानिक भूमिपूत्रांना नोकरीत सामावून घेतले नाही. उलट परप्रांतीयांची भरती बारामती एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात झाली आहे. मोठ्या कंपन्यांमध्ये अधिकारी आणि कामगार संघटनांच्या नेत्यांनी संगनमताने स्थानिकांना डावलून अन्य भागातील कामगारांना नोकरीवर घेतले आहे. या विरोधात स्थानिक भूमिपूत्रांनी ‘एल्गार’ पुकारला आहे. न्याय न मिळाल्यास आमरण उपोषणाचे हत्यार उपसले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.२० वर्षांपूर्वी बारामती एमआयडीसीसाठी रुई, तांदूळवाडी, कटफळ, जळोची, वंजारवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल किमतीने संपादित करण्यात आल्या. त्या वेळी स्थानिक शेतकऱ्यांच्या मुलांना नोकरीत समावून घेतले जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, एमआयडीसीतील मोठ्या कंपन्यांना त्याचा विसर पडला आहे. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी एमआयडीसीने झटकली.या कंपन्यांमध्ये कायम कामगार भरतीत स्थानिकांना डावलले जाते. ज्या शेतकऱ्यांचे भूखंड संपादित केले, त्यांच्या मुलांनादेखील न्याय मिळालेला नाही. त्यामुळे परिसरात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यावेळी भूसंपादन करताना कवडीमोल किमतीने जमिनी घेतल्या. अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत. सध्या परिसराचे नागरीकरण वाढत आहे. त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक जीवनमानाचा दुष्परिणाम वाढत आहे. या स्थितीत येत्या ८ दिवसांत एमआयडीसीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी स्थानिक भूमिपूत्रांना कायम नोकरीसाठी संधी द्यावी, अशी मागणी या परिसरातील तरुणांनी केली आहे. याबाबत एमआयडीसीचे मुंबईतील मुख्यालय, सर्व कंपन्या, प्रादेशिक कार्यालय, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांना निवेदन दिले आहे. ८ दिवसांत यावर तोडगा न काढल्यास एमआयडीसीतील पेन्सील चौकात कोणतीही पूर्व कल्पना न देता सामूहिक आमरण उपोषणाला सुरुवात केली जाईल, असे वंजारवाडी गावचे उपसरपंच दादा चौधर, सदस्य केशव चौधर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)