शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, भास्करराव पाटील खतगावकरांची समर्थकांसह काँग्रेसमध्ये घरवापसी 
3
Video : जंगलात फिरताना चुकून अस्वलाच्या घरात गेला अन्...; पहा इन्फ्लूअन्सर काय घडलं?
4
ऑनलाईन गेमच्या नादात JEE क्वालिफाय तरुणावर ९६ लाखांचं कर्ज; आयुष्य झालं उद्ध्वस्त, म्हणाला...
5
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
6
संग्रामसाठी पत्नी मैदानात; अंकिता, पॅडी कांबळेसह ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर, पाहा Video
7
अंबानींच्या ₹1च्या शेअरनं दिला खटा-खट परतावा, कर्ज कमी होताच पाडतोय पैशांचा पाऊस, करतोय मालामाल!
8
पगारातून पूर्ण होत नव्हते शौक, यूट्युबवरून शोधलं बनावट नोटा छापण्याचं तंत्र आणि..., ६ जण अटकेत 
9
होणारी सून निघाली हरवलेली मुलगी, नवऱ्याच्या आईला लग्नमंडपात कळलं सत्य अन् मग...
10
शनिवारी संकष्ट चतुर्थी: तुमची साडेसाती सुरु आहे? ‘हे’ उपाय अवश्य करा; बाप्पा-शनी शुभ करतील! 
11
एलन मस्कही चक्रावले! टेस्लाच्या सायबर ट्रकची रशिया-युक्रेन युद्धात एन्ट्री; सात किमीपर्यंत गनचा मारा
12
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
13
'आप'कडून अरविंद केजरीवालांसाठी सरकारी निवासस्थानाची मागणी, निवडणूक आयोगाच्या नियमांचा दिला हवाला 
14
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
15
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
16
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
17
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
18
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
19
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
20
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा

तीर्थक्षेत्र आळंदी : सलग दुसऱ्या दिवशी पवित्र इंद्रायणी रसायनयुक्त फेसाने फेसाळली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 3:41 PM

विशेषतः आषाढीवारी पाच ते सहा दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे....

- भानुदास पऱ्हाड

आळंदी (पुणे) : तीर्थक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदी मागील दोन दिवसांपासून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात फेसाळली आहे. रसायनमिश्रित पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट नदी पात्रात सोडणे, मैलामिश्रित पाणी नदीत सोडणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. विशेषतः आषाढीवारी पाच ते सहा दिवसांवर आल्याने आळंदीतील इंद्रायणी नदी स्वच्छ असणे गरजेचे असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती गंभीर आहे.

मागील अनेक दिवसांपासून इंद्रायणी नदी प्रदूषित होत आहे. औद्योगिक वसाहत क्षेत्रातून प्रक्रिया न करता थेट इंद्रायणी पात्रात सोडले जात असलेले रसायन मिश्रित पाणी व सांडपाणी हे नदीतील पाणी प्रदूषणाचे मुख्य कारण आहे. त्या पाण्यामुळे नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पांढराशुभ्र फेस निर्माण होत आहे. जुन्या बंधाऱ्या खालील नदीपात्रातील पाणी या पांढऱ्या शुभ्र तरंगणाऱ्या फेसाने झाकून जात आहे. अगदी पाण्यावर तरंगणारा फेस पाहून समक्षदर्शीना बर्फाच्छादित भागाची आठवण होत आहे.

इंद्रायणीत रसायनयुक्त सांडपाण्यामुळे जलचर जीवांचे जीव धोक्यात आले आहे. तसेच इंद्रायणी नदीपात्रातील पाणी शेतपंपाद्वारे शेतीला नेले जाते. प्रदूषित पाणी विविध पिकांना दिले जाते. त्या प्रदूषित पाण्याचा पिकांवर दुरोगामी परिणाम होतो. परिणामी ही पिके माणसांसह जनावरांच्या आरोग्यासाठी खाणे अपायकारक ठरत चालली आहेत. या नदीपात्राच्या प्रदूषित पाण्यामुळे जवळपास असणाऱ्या विहिरी बोर यांच्या पाण्यामध्ये परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तर इंद्रायणीतील पाणी तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्या व त्यात स्नान करणाऱ्या वारकऱ्यांना पोटाचे विकार तसेच त्वचा विकार देखील पसरण्याचा धोका संभवतो आहे. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

उपाययोजना कागदावर...

हिवाळी अधिवेशनात आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी इंद्रायणीच्या वाढत्या प्रदूषणाचा मुद्दा शासनासमोर लक्षवेधी करून मांडला होता. मंत्री उदय सामंत यांनी इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावले उचलणार असून इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्त करणार असल्याची ग्वाही दिली होती. मात्र प्रत्यक्षात फारशा उपाययोजना झालेल्या नाहीत. त्यामुळे केवळ कागदी घोडे नाचविण्यात प्रशासन मग्न असल्याच्या तीव्र प्रतिक्रिया स्थानिक जनतेकडून व्यक्त होत आहेत.

वारकऱ्यांनी पाणी पिऊ नये...

आषाढीवारी निमित्त पुढील चार ते पाच दिवसात लाखो वारकरी आळंदीत दाखल होणार असून इंद्रायणी नदीत ते पवित्र स्नान करणार आहेत. तसेच तीर्थ म्हणून हेच रसायनयुक्त पाणी काही वारकरी प्राशन करतात. मात्र पाण्यात रसायन मिश्रण असल्याने वारकऱ्यांनी नदीतील पाणी पिणे घातक ठरू शकते. तर या पाण्यामुळे आजारही जडू शकतात. मागील काही वर्षांपासून अनेकदा अशी परिस्थिती उद्भवत आहे. विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तशा तक्रारी ही करण्यात आल्या आहेत. 

इंद्रायणी नदीबाबतची उदासीनता दूर होणार का? एकीकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने डोळ्यावर पट्टी बांधली आहे, तर दुसरीकडे राज्यसरकार केवळ आश्वासनं देण्यावर धन्यता मानत आहे. इंद्रायणी नदीने मोकळा श्वास घ्यावा एवढीच स्थानिक जनता व वारकऱ्यांची माफक अपेक्षा आहे.

दोनशे क्यूसेक्स पाणी सोडले...

आषाढी सोहळयाच्या पार्श्वभूमीवर आळंदी व देहूसाठी आंद्रा धरणातून १०० व वडिवळे धरणामधून १०० असा एकत्रितपणे दोनशे कुसेक्स पाण्याचा विसर्ग इंद्रायणी नदीमध्ये बुधवारपासून (दि. १९) सोडण्यात आलेला आहे. साधारणपणे 25 तारखेपर्यंत हे पाणी आळंदी येथील इंद्रायणी पात्रात पोहचेल अशी माहिती मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

टॅग्स :indrayaniइंद्रायणीpollutionप्रदूषणashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022