शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
3
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
4
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
5
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
6
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
7
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
8
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
9
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
10
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
11
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
12
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
13
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
14
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
15
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
16
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
17
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
18
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
19
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
20
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा

पीएमपी होणार ‘प्रवासीभिमुख’

By admin | Published: March 05, 2017 4:29 AM

प्रवाशांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेला ‘प्रवासी दिन’ मागील काही महिन्यांपासून केवळ कागदावर उरल्याचे

पिंपरी : प्रवाशांच्या तक्रारी, सूचना जाणून घेण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सुरू केलेला ‘प्रवासी दिन’ मागील काही महिन्यांपासून केवळ कागदावर उरल्याचे चित्र होते. आता पुन्हा हा दिवस अधिक प्रवासीभिमुख करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पावले उचलली आहेत. प्रवासी दिन केवळ आगारांपुरता मर्यादित न ठेवता पुणे व पिंपरी-चिंचवडमधील प्रमुख २३ बसस्थानकांवरही आयोजित केला जाणार आहे.बससेवा अधिक चांगली करण्यासाठी पीएमपी प्रशासनाने पुन्हा बसस्थानकांवर प्रवासी दिन आयोजनाची पावले उचलली आहेत. त्यानुसार दोन्ही शहरांतील २३ प्रमुख बसस्थानकांवर प्रवासी दिनाचे आयोजन केले जाणार आहे. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत प्रवाशांना या स्थानकांवर आपल्या तक्रारी, हरकती, सूचना नोंदविता येणार आहेत. या बसस्थानकांव्यतिरिक्त १३ आगारांमध्येही प्रवाशांना सूचना मांडता येणार आहेत. या स्थानकांवर अधिकाऱ्यांची नियुक्तीही केली जाणार आहे, अशी माहिती पीएमपीचे महाव्यवस्थापक (संचलन) अनंत वाघमारे यांनी दिली.विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी व त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यासाठी पीएमपीतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिन आयोजित केला जातो. या दिवशी पीएमपी सर्व आगारांमध्ये प्रवासी दिनामध्ये प्रवाशांशी संवाद साधला जातो. (प्रतिनिधी)प्रमुख बसस्थानकांत होणार प्रवासी दिन वाघोली, महात्मा गांधी स्थानक, स्वारगेट, विश्रांतवाडी, हिंजवडी, डेक्कन, मंडई, खडकी बाजार, शिवाजीनगर, डेंगळे पूल, मनपा भवन, माळवाडी /गणपती माथा, कात्रज, हडपसर गाडीतळ, अप्पर डेपो, मोलेदिना, भक्ती शक्ती, भोसरी, चिंचवड, भेकराईनगर, धनकवडी, भारती विद्यापीठ, आकुर्डी रेल्वे स्टेशन.विविध मार्गांवर, स्थानकांवर प्रवाशांना चांगली, तत्पर सेवा देण्याच्या दृष्टीने प्रवाशांना येणाऱ्या अडचणी, तक्रारी व त्यांनी केलेल्या सूचनांची दखल घेण्यासाठी पीएमपीतर्फे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रवासी दिन आयोजित केला जातो. या दिवशी पीएमपी सर्व आगारांमध्ये प्रवासी दिनामध्ये प्रवाशांशी संवाद साधला जातो. हा दिवस केवळ आगारांपुरता मर्यादित न ठेवता अधिक प्रवासीभिमुख व्हावा, यासाठी पीएमपीचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्रीकर परदेशी यांनी दोन्ही शहरांतील प्रमुख बसस्थानंकावर प्रवासी दिन आयोजित करण्यास सुरुवात केली. मात्र, परदेशी यांची बदली झाल्यानंतर काही महिन्यांतच हा दिवस केवळ कागदावरच उरल्याचे चित्र दिसत होते.