शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
3
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
4
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
5
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
6
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
7
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
8
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
9
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
10
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
11
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
12
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
13
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
14
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
15
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
16
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
17
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
18
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
19
काश्मीरला जाण्यासाठी अनेक महिने पैसे साठवले; आनंद, स्वप्न पूर्ण करायला गेले अन् घात झाला 
20
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...

बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही; आमदार शशिकांत शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 17:08 IST

बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामती ने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले असा अपप्रचार विरोधक करतात

बारामती: बारामतीचे नाव घेतल्याशिवाय राजकारण चालत नाही. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते. बारामतीत आल्यानंतर वेगळे बोलायचे मराठवाड्यात गेल्यानंतर बारामती वर बोलायचे, हा प्रकार योग्य नाही. अशा प्रकारचा टोला माजी जलसंपदामंत्री शशिकांत शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शनिवारी (दि. १७) धाराशिव येथे पांगदरवाडी येथील प्रकल्पाच्या भूमिपूजनासाठी गेले होते. यावेळी त्यांनी बारामतीने मराठवाड्याचे पाणी आडवले होते. असा आरोप केला होता. तो आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी फेटाळला. परंतु रविवारी (दि. १८) आमदार शशिकांत शिंदे हे विरोधी पक्षनेते अजित पवार यांना भेटण्यासाठी बारामतीत आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. 

ते म्हणाले की, कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्याचा अधिकार हा एकट्या आमदार, खासदार यांना नसतो तो संपूर्ण राज्याला असतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला असतो. कोणतीही गोष्ट ठरताना ती फक्त एका एका आमदार खासदारापूर्ती ठरत नाही तर ती संपूर्ण राज्य आणि केंद्र किंवा देशा समोर ठेवून तो निर्णय घेतलेला असतो. आणि अशा वेळी कोणावर ही वैयक्तिक टीका करणं हे बरोबर नाही राजकारणाचा अलीकडचा स्तर घसरलेला आहे अलीकडच्या काळामध्ये कोणताही मंत्री हा कोणत्याही एका भागाचा नसतो कोणताही नेता हा एका भागाचा नसतो तो संपूर्ण राज्य किंवा देशाचा असतो. परंतु अलीकडच्या भागांमध्ये अशा प्रकारचे राजकारण पाहायला मिळत आहे. बारामतीचे नाव घेतले की प्रसिद्धी मिळते म्हणून बारामती ने पाणी पळवले, बारामतीने अमुक केले असा अपप्रचार विरोधक करतात त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही. वास्तविक पाहता आम्ही मंत्रिमंडळात असताना मराठवाड्याला पाणी देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला. कुठेही पाणी कुणाचेही अडवलेले नाही, असे शिंदे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेShashikant Shindeशशिकांत शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवारBaramatiबारामती