शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

 कोरेगाव भीमा मुद्यावरून पुण्यात राजकारण पेटले :काँग्रेसची भाजपवर विखारी टीका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 21:10 IST

कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे कोरेगाव भीमा मुद्द्यावरून पुण्यात राजकीय युद्धाला सुरुवात सरकारचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर आरोप, काँग्रेसची भाजपवर टीका 

 

पुणे :  कोरेगाव भीमा मुद्दावरून पुण्यात चांगलेच राजकारण पेटले असून बुधवारी भाजपचे खासदार माजी प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीच्या अहवालावर शहर काँग्रेसतर्फे पत्रक काढून टीका करण्यात आली आहे. भाजप सरकारने स्वतःचे अपयश झाकण्यासाठी पोलिसांवर खापर फोडले असल्याची टीका शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे. 

    भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांनी सत्यशोधन समितीने कोरेगाव भीमा येथे  १ जानेवारी २०१८रोजी झालेल्या तयार केलेला अहवाल प्रसिद्ध केला होता. त्यात  हा माओवादी विचारांच्या संघटना,खोटा इतिहास पसरवून जातीय तेढ निर्माण करणाऱ्या फुटीरतावादी गट याचा पूर्वनियोजित कट होता,यात आंबेडकरी व हिंदुत्ववादी गटाचा  यामध्ये काहीही संबंध नाही असा निष्कर्ष मांडण्यात आला. त्यावेळी रावत यांनी बोलताना पोलिसच या हिंसाचाराला जबाबदार असून वढू येथून तीन किलोमीटर भगवे झेंडे घेऊन कोरेगांव भीमाकडे जाणार्‍या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखून जमावातील लोकांना इतर ठिकाणी हालविले असते तर कोरेगांव भीमा येथील हिंसाचार टळला असता असे सांगितले. परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील, पुणे ग्रामीण पोलिस आधिक्षक आणि शहर पोलिस आयुक्तांनी याप्रकरणामध्ये राज्य शासनाची दिशाभूल केली आहे, असा आरोप ही त्यांनी केला होता.

      या आरोपाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने उत्तर देण्यात  असून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक हे अल्पसंख्यांक समाजचे असल्यामुळे त्यांच्यावर जाणूनबुजून खापर फोडले जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. आपल्या पक्षाच्या सरकारचे अपयश झाकण्यासाठी  जजाणून बुजून भाजपचे खासदार त्यांना बदनाम करत आहेत व जनतेची दिशाभूल करण्यासाठी नक्षलवाद्यांनी ही दंगल घडवून आणली असा आरोप करत आहेत  असेही काँग्रेसच्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या हिंसाचारात मृत्यमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री भेटले नसून पालकमंत्रीही गिरीश बापटही ही परिस्थिती हाताळण्यास अयशस्वी ठरल्याचेही यात म्हटले आहे. थेट सत्ताधारी भाजपवर काँग्रेसने केलेल्या आरोपामुळे आता हा विषय अधिक संवेदनशील बनत चालला असून शुक्रवारपर्यंत इतर राजकीय पक्षही त्यात उडी मारण्याची शक्यता आहे. 

 

 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणBhima-koregaonभीमा-कोरेगाव