शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिफॉर्म-परफॉर्म-ट्रान्सफॉर्म; भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार"- PM मोदी
2
शरद पवारांनी दिला आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा सल्ला, जरांगे पाटील म्हणाले, आधी मराठ्यांना...
3
Raj Thackeray : "संरक्षक जाळ्या काढून तुमचाच कडेलोट…", नरहरी झिरवळांच्या आंदोलनावर राज ठाकरेंची टीका
4
ऐतिहासिक वाढ! भारताचा परकीय चलन साठा पहिल्यांदाच 700 अब्ज डॉलर्स पार
5
Womens T20 World Cup स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत ब्रिगेड अडखळली!
6
Thane: तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाचा खून, तरुणीसह दाेघे पाेलिसांच्या ताब्यात
7
छत्तीसगडच्या बस्तरमध्ये भीषण चकमक; सुरक्षा दलांनी 30 नक्षलवाद्यांचा केला खात्मा
8
'रन आउट' करूनही मिळाली नाही विकेट! हरमनप्रीतसह स्मृतीलाही आला राग (VIDEO)
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेची माफी मागावी- प्रल्हाद सिंह पटेल

By नितीन चौधरी | Published: November 12, 2022 4:52 PM

मविआ सरकारने जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला; राज्यमंत्र्यांचे आरोप

- नितीन चौधरी

पुणे : महविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात राज्यातील जनतेला पाण्यापासून वंचित ठेवले. जलजीवन मिशनच्या कामाला सरकारने ब्रेक लावला. त्यामुळे आघाडी सरकारच्या शिल्पकार असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेसच्या नेत्यांनी राज्याच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अन्न प्रक्रिया व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांनी केली

दोन दिवसीय बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्यानंतर ते शनिवारी (त. १२) पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. यावेळी माजी मंत्री राम शिंदे, आमदार भीमराव तापकीर, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे आदी भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.

मविआ सरकारकाळात चांगले काम नाही-

प्रल्हाद सिंह पटेल म्हणाले, ''देशात २०१९ मध्ये जलजीवन मिशनला सुरुवात झाली. महाराष्ट्रापेक्षा कमी काम असलेल्या तेलंगणा, हरियाणा आणि गोवा राज्याने महाराष्ट्रापेक्षा चांगले काम करून जल जीवनमध्ये आघाडी घेतली. मात्र, महाविकास आघाडी सरकारच्या काळात चांगले काम झालेले नाही. केंद्राने कोणताही भेदभाव करता सर्व राज्यांना जल जीवन मिशनसाठी निधी दिला. योजनेची अंमलबजावणीची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे, त्यामुळे निधी देऊनही कामाला गती या सरकारने दिली नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्यास तत्कालीन सरकार जबाबदार असल्याने त्यावेळच्या नेत्यांनी जनेतची माफी मागावी. दरम्यान, २०२४ मध्ये पुन्हा भाजप बहुमताने सत्तेवर येईल आणि त्यावेळी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पवारांनी कोणती सहकारी संस्था उभी केली नाहीपटेल यांनी दोन दिवसांचा बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. 'मात्र, मला विकास दिसला नाही तर नागरिकांमध्ये भीती दिसली,' असा आरोपही पटेल यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ''राजकारणातील त्यांची उंची बघता मी त्यांना साहेबच म्हणेल, परंतु त्यांनी एकही सहकारी संस्था उभी केल्याचे माझ्या माहितीत नाही.'' जगातील अन्य देशांचे तुलनेत भारतात इंधन स्वस्त आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसgoaगोवाTelanganaतेलंगणा