शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारल्याने पुरस्कारांचे मोल कमी होत नाही : नाना पाटेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2018 21:23 IST

राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही,

ठळक मुद्देबालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही

पुणे :  कलाकारांसाठी राष्ट्रीय पुरस्काराचे वेगळे महत्व असते. मलाही राष्ट्रपतींच्याच हस्ते तीन पुरस्कार मिळाले. त्यामुळे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपतींच्याच हस्ते मिळावा, अशी अपेक्षा ठेवणे सार्थ आहे. पुरस्कार त्यांच्याच हस्ते मिळाला नाही तर कलाकारांची नाराजीही स्वाभाविक आहे. मात्र, राष्ट्रपतींच्या व्यस्त वेळापत्रकामुळे त्यांच्या अनुपस्थितीत स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्यात काही गैर नाही. त्यामुळे पुरस्काराचे मोल कमी होत नाही, अशी भूमिका ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी मांडली.   ६५ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे वितरण गुरुवारी नवी दिल्ली येथे पार पडले. राष्ट्रपतींच्या हस्ते केवळ ११ पुरस्कार देण्यात आले. त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे स्मृती इराणी यांच्या हस्ते उर्वरित पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. याबाबत कलाकारांनी आक्षेप नोंदवला. याबाबत पुण्यातील एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना नाना पाटेकर यांनी मत व्यक्त केले.बालगंधर्व रंगमंदिराच्या पुनर्विकासाबाबत विचारले असता पाटेकर म्हणाले, ‘जास्त एफएसआय मिळत असेल आणि अधिक नाट्यगृहे उभारता येत असतील तर बालगंधर्व नाट्यगृहाचा पुनर्विकास करायला हरकत नाही. जुनी वास्तू आहे,आमच्या काळात असं होतं म्हणण्यात अर्थ नाही. नाट्यवेडया प्रेक्षकाची कलाकृतींकडील ओढ कमी होत नाही. त्यामुळं नवीन नाट्यगृह बांधायला उशीर झाला तरी प्रेक्षक दूर जातील, असे वाटत नाही.’ आयपीएल दोन वर्षात बंद पडेल, असे वाटलं होते. मात्र, दहा वर्षे उलटूनही प्रतिसाद कायम आहे, असे सांगत नानापाटेकर यांनी बालगंधर्व नाट्यगृहाचा पुर्नविकास करुन नवीन वास्तू बांधण्याच्या बाजूने भूमिका घेतली.

 

टॅग्स :PuneपुणेNana Patekarनाना पाटेकरNational Film Awardsराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2018Bal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिर