शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

समस्यांचे बसथांबे!

By admin | Published: October 15, 2015 12:52 AM

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे.

ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी उभारण्यात आलेले बहुतांश बसथांबे मोडकळीस आले आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रशासनाने दुर्लक्षित केलेल्या बसथांब्याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. अनेक बसस्थानक परिसरात स्वच्छतागृहासारख्या मूलभूत सुविधा नाही. ऊन, वारा, पाऊस यांपासून संरक्षण करण्यासाठी महामंडळ अपयशी ठरले आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद असणारे महामंडळ प्रवाशांसाठी गैरसोयीचे ठरत आहे. ‘लोकमत’ने गावोगावच्या बसस्थानकांचा घेतलेला आढावा...डोर्लेवाडी : झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमधील प्रवाशांना बस स्थानकाची सोय नसल्याने भरउन्हामध्ये व पावसामध्ये थांबावे लागते. बारामती-कळंब हा तीर्थक्षेत्रासाठी जाणारा जवळचा मार्ग असल्याने या रस्त्यावर रहदारी जास्त असते. तीर्थक्षेत्रासाठी जाणाऱ्या बसची सोयसुद्धा आहे. परंतु, झारगडवाडी, डोर्लेवाडी, गुणवडी या गावांमध्ये प्रवाशांना थांबण्यासाठी बस स्थानक नसल्याने भरउन्हामध्ये, तसेच पावसाळ्यात पावसामध्ये उभे राहावे लागते. प्रवासी झाडाच्या सावलीत बाजूला उभा राहिला, तर बस दिसत नाही. चालक थांब्यावर कोणी नसल्याने बस न थांबवता जातात, असे अनेक वेळा घडले आहे. भरउन्हामध्ये, पावसामध्ये उभे राहावे लागते. यासाठी वरील सर्व ग्रामपंचायतींनी लवकरात लवकर बस स्थानकाची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.याअगोदर पदाधिकाऱ्यांनी ते केले नाही. माझा सरपंचपदाचा दोन महिन्यांचा कालावधी राहिला आहे, असे सांगितले. झारगडवाडीच्या सरपंच अनिता लांडगे यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बस स्थानक बांधलेले आहे. हे बस स्थानक चौकाच्या बाहेर आहे. तिथे बसण्यासाठी कुठलाच प्रवासी जात नाही. ते बांधून काय उपयोग? जिथे बसची वाट पाहत प्रवासी थांबतात तिथे बस स्थानक नाही. वरील गावांमध्ये बस स्थानक नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.-नामदेव लाड, सरपंच, गुणवडी