शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
2
अजित पवार बारामतीमधून माघार घेणार? कार्यकर्त्यांसमोर दिले सूचक संकेत 
3
रेल्वे कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची मोठी भेट! नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बोनस मंजूर, मिळणार 'इतकी' रक्कम! 
4
Women's T20 World Cup : कॅप्टन Fatima Sana ची अष्टपैलू खेळी; लंकेविरुद्ध पाकचा 'डंका'
5
"आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस’’, देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
6
मुलीच्या अपहरणाची तक्रार देणारा बापच निघाला विकृत, वडिलांच्याच अत्याचाराला कंटाळून मुलीने सोडले होते घर
7
अखेर सापडलं सोन्याचं घुबड, ३१ वर्षांपासून शोघ घेत होता संपूर्ण देश, नेमकं कारण काय?  
8
धक्कादायक! घरात घुसून पती-पत्नीसह दोन चिमुकल्यांची हत्या; CM योगींनी दिले कारवाईचे आदेश
9
केकमुळे कॅन्सरचा धोका! अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता विभागाच्या अहवालात मोठा खुलासा
10
एक दोन नव्हे, तब्बल 7 आघाड्यांवर युद्ध लढतोय चिमुकला इस्रायल; जाणून घ्या, ज्यूंचे शत्रू कोण कोण?
11
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
12
Sangli: शरद पवारांच्या दौऱ्याने सांगलीत भाजपला मोठा धक्का; राजेंद्रअण्णा देशमुख पवार गटात
13
वैवाहिक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
14
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
15
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
16
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
17
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
18
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
20
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार

देशात पाच लाख टन साखरेचे उत्पादन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 10:00 PM

उत्तरप्रदेश आघाडीवर : देशातील दीडशे कारखाने झाले सुरु

ठळक मुद्देगेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु

पुणे : देशातील शंभर साखर कारखाने सुरु झाले असून, त्यात ४.८५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्रातील ऊस गाळपास २२ नोव्हेंबर पासून सुरुवात झाला आहे. मात्र, अजूनही हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच कारखाने सुरु झाले असल्याने गेल्यावर्षीपेक्षा देशाचे साखर उत्पादन निम्मे देखील झालेले नाही. गेल्यावर्षी याच काळात देशभरातील ३१० साखर कारखाने सुरु झाले होते. लांबलेला पाऊस आणि उसाचे नुकसान झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कारखाने सुरु होण्यास विलंब लागला. महाराष्ट्रात २०१८-१९ या ऊस गाळप हंगामात १५ नोव्हेंबर अखेरीस १४९ साखर कारखाने सुरु झाले होते. तसेच, ६.३१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. यंदा हंगाम २२ नोव्हेंबर पासून सुरु करण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. सद्य:स्थितीत राज्यातील सहा कारखानेच सुरु झाले आहेत. कर्नाटकातील १८ कारखाने सुरु झाले असून, १.४९ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. गेल्यावर्षी ५३ कारखान्यात ३.६० लाख टन साखर उत्पादित झाली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकात गेल्यावर्षी दुष्काळी स्थिती असल्याने उसाचे क्षेत्र घटले आहे. त्यातच यंदा झालेल्या पुरामुळे मोठे नुकसान झाल्याने साखरेच्या उत्पादनात गेल्यावर्षीच्या तुलनेत ४५ ते ५० लाख टनांची घट होण्याचा अंदाज आहे. उत्तरप्रदेशातील ६९ कारखाने सुरु झाले असून, २.९३ लाख टन साखर उत्पादित झाली होती. गेल्यावर्षी याच काळात १.७६ लाख टन साखर उत्पादित झाली होती. उत्तराखंड आणि बिहारमधील प्रत्येकी २, हरयाणा १, गुजरात ३ आणि तमिळनाडूमधील ५ कारखाने सुरु झाले आहेत. या कारखान्यांनी ४९ हजार टन साखर उत्पादित केली आहे. -------------------देशात २ लाख टन साखरेची निर्यात देशातील ५३५ कारखान्यांच्या गोदामामधे १४५ लाख टन साखर शिल्लक आहे. त्यामुळे यंदा ६० लाख टन साखर निर्यातीस केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. त्या पैकी २ लाख टन साखरेची निर्यात झाली असून, १२ लाख टन साखर निर्याचीचे करार झाले आहेत. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीGovernmentसरकार