शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
2
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
3
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
4
देशातील मुस्लिमांना दाबले जाते, म्हणून पहलगाम हल्ला झाला; रॉबर्ड वाड्रांचे धक्कादायक वक्तव्य
5
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
6
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
7
Pahalgam Attack Update : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
8
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
9
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
10
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
11
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
14
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'या' बँकेचे शेअर्स विकण्यासाठी रांग, ९% टक्क्यांपेक्षा जास्त आपटला
15
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'
16
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधून पहिल्यांदाच उमटल्या अशा प्रतिक्रिया, दिसल्या या चार गोष्टी    
17
ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश
18
भोपाळ जवळ GAIL प्लांटमध्ये मिथेन गॅस गळती; परिसरात भीतीचे वातावरण
19
बाळाला खाली ठेवायला लावले आणि तीन मिनिटे चालवल्या गोळ्या; भरत भूषण यांच्या सासूने सांगितली आपबिती
20
स्वामी समर्थ स्मरण दिन: ३ दिवस सेवा करा, असीम कृपेचे धनी व्हा; शुभ घडेल, अशक्यही शक्य होईल!

अभिमानास्पद! महाराष्ट्राच्या सुपुत्राचा 'कारगिल'मध्ये झेंडा; मेळघाटातला संतोष झाला जिल्हाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 20:18 IST

कारगिलचे युद्ध झालं तेव्हा संतोष अवघ्या सहा वर्षांचा होता...

पुणे : महाराष्ट्रातल्या मेळघाटमधल्या मुलाने थेट कारगिल गाठले आहे. अर्थात ते कारगिल पर्यटनासाठी नाही तर थेट कारगिलचा जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाला आहे.

अर्थात 27 वर्षांच्या संतोष सुखदेवेने कारगिलबद्दल वाचले ते बातम्यांमधूनच. कारगिलचे युद्ध झालं तेव्हा संतोष अवघ्या सहा वर्षांचा होता. मेळघाटातल्या मधलं 600 ते 700 लोकवस्तीचे धारणी जवळचं नारवाटी हे संतोषचे गाव. हातातोंडाशी गाठ असलेल्या आई-वडिलांना आणि गावातल्या लोकांना छोट्या छोट्या कामांसाठी सरकारी अधिकाऱ्यांकडे खेटे घालताना संतोष लहानपणापासूनच पहात होता. अर्थात आपल्या आयुष्याचं ध्येय होईल हा विचार ‌मात्र त्यानी बारावी झाली तरी केला नव्हता.

गावात विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा... अभ्यासात हुशार असलेल्या संतोषला पुढच्या शिक्षणासाठी जवळच्या गावात ॲडमिशन मिळाली. त्याची हुशारी पाहून शाळेतल्या एका शिक्षकांनी त्याला नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यायचं सुचवलं. अमरावतीच्या नवोदय विद्यालयात प्रवेश झाला आणि हा संतोषच्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

बारावीपर्यंत नवोदयमध्ये शिक्षण घेतल्यानंतर संतोषनी इंजिनीयरिंग करायचं ठरवले. त्यासाठी त्याला पुण्याचा सीओईपीमध्ये ऍडमिशन देखील मिळाली. अर्थात पहिली अडचण पुण्यात दाखल झाल्यावर आली ती राहायची. कॉलेज चा वसतिगृहात प्रवेश ना मिळाल्याने कुठे राहायचं हा पहिलाच प्रश्न होता. गोखलेनगरचा विद्यार्थी सहाय्यक समितीने हा प्रश्न सोडवला. राहायची सोय झाल्यावर त्याने स्कॉलरशिप आणि कमवा शिका मधून शिक्षणाचा खर्च भागवायला सुरुवात केली. पण शिकतोय ते पुरेसं नाही असं त्याला सतत वाटत होतं. 

पण मग करायचं काय हे ही कळत नव्हतं. लोकमत शी बोलताना संतोष म्हणाला ," वेगवेगळ्या माध्यमातून मी लोकांना मदत करायचो आणि ते मला आवडत होतं त्याचं समाधान मिळत होतं. गावी लोकांचे होणारे हाल ही पाहिले होते. त्यातून ठरवलं की आपण ज्यातून बदल घडवता येईल अस काही करू. समोर दोन पर्याय होते एक म्हणजे एनजीओ मध्ये काम करणे आणि दुसरा म्हणजे सरकारी नोकरी करणे. मी अर्थातच दुसरा पर्याय निवडला." 

इंजिनिअरिंगचा शेवटचा वर्षाला असताना संतोष नी यूपीएससीची तयारी सुरू केली. सिव्हिल इंजिनिअरिंग संपताना संतोष ला बार्टी मधून दिल्लीला यू पी एस सी ची तयारी करण्यासाठी जाण्याची संधी मिळाली. जवळपास दीड वर्ष तयारी झाल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा परीक्षा दिली आणि त्यातच तो पास ही झाला.निकाल लागल्यावर संतोष नी आई वडिलांना निकाल कळवायला फोन केला "आई म्हणाली चांगलं झालं तुला सरकारी नोकरी लागली. तिला आय ए एस होणं म्हणजे काय हे माहीत नव्हतं. मग मी तिला सांगितलं की मी नेमका काय काम करणार आहे " संतोष म्हणाला.

त्यानंतर ट्रेनिंग पूर्ण झालं आणि मग त्याला कॅडर मिळाले ते जम्मू काश्मीर. " काश्मीर ची आई वडीलांची इमेज होती ती बातम्या मधून पाहिलेली. ते घाबरले. पण मी ट्रेनिंग मध्ये त्यांना इथे काय वातावरण आहे ते पहिल्याच सांगितलं. " 

अर्थात सांगितलं तितकं हे सोपं नव्हतं असं संतोष च म्हणणं आहे. आधी एस डी एम म्हणून काम केल्यावर त्याला जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालं ते थेट कारगील चं. संतोष चा मते ज्या खुर्चीवर बसायचं स्वप्नं होतं ते पूर्ण झाले पण तर आव्हाने ही घेऊन आले आहे. तो म्हणतो " कारगिल हे माहीत असलेलं ठिकाण असलं तरी विकासाचा बाबतीत ते अगदी मागे आहे. इथे शिक्षणाचे प्रमाण अगदी कमी आहे. त्याचाच परिणाम म्हणजे बेरोजगारी च प्रमाण जास्त. पर्यटक इथे येतात ते ही धावती भेट द्यायला. या सगळ्याच बाबतीत काम करायची गरज आहे.सरकारी योजना राबवून हा विकास करायचा आहे. मेळघाट चा अडचणी अनुभवल्या आहेत.त्यामुळे जमिनीशी नाळ जोडलेली आहे. इथून पुढेही तेच करायचं आहे. 

टॅग्स :PuneपुणेKargil Vijay Diwasकारगिल विजय दिनcollectorजिल्हाधिकारीMelghatमेळघाट