शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

वाहनधारकांची होतेय लूट..!'उच्च सुरक्षा नंबर प्लेट'साठी पैसे भरूनही वेळेवर मिळेना सेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 15:09 IST

-प्लेट बदलण्यासाठी राज्य सरकारकडून ३० जूनपर्यंत मिळाली मुदत

- अंबादास गवंडीपुणे : राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी काही ठिकाणी अव्वाच्या सवा दर आकारले जात आहेत. त्यामुळे वाहनधारकांची लूट होत असून, पैसे भरूनही दिलेल्या तारखेनुसार उच्च सुरक्षा पाटी मिळत नसल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे वाहनधारकांची दुहेरी फटका बसत आहे.न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील २०१९ पूर्वीच्या वाहनांना उच्च सुरक्षा पाटी लावण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परंतु, ज्या-ज्या कंपनीला काम देण्यात आले आहे, त्यांच्याकडे असलेली यंत्रणा तोकडी ठरत आहे. दुसरीकडे वाहनधारकांकडून प्रतिसाद कमी मिळत आहे. शिवाय नंबर प्लेट लावण्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ढिसाळ नियोजनामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.या आहेत अडचणी  ग्रामीण भागात फिटमेंट सेंटर नसल्याने जिल्ह्याच्या ठिकाणी जावे लागते.दुचाकी वाहनांसाठी केवळ १७०० फिटमेंट सेंटर.अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढले, परंतु यंत्रणा तोकडी असल्याने वेळेवर नंबर प्लेट मिळेना.ऑनलाइन अर्ज करताना नागरिकांना अडचणी.फिटमेंट सेंटर वाढविण्याकडे दुर्लक्ष उच्च सुरक्षा पाटी लावण्याचे काममिळालेल्या कंपन्यांना आरटीओकडून फिटमेंट सेंटर वाढविण्याच्या सूचना दिल्या आहेत. तरीही सेंटरची संख्या काही वाढत नाही. त्यामुळे नागरिकांना खूप दूरच्या तारखा मिळत आहेत. त्यात आता काही सेंटरकडून अचानक काम बंद केले जात असल्याचा फटका वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागातील परिस्थिती २ अतिशय बिकट असून, त्याकडे परिवहन विभागाचे मात्र दुर्लक्ष होत आहे. तसेच काही फिटमेंट चालक आरसी बुक, चेसिस क्रमांकाची कोणतीही पूर्वतपासणी न करता दुसऱ्या व्यक्तीच्या हातात सुरक्षा पाटी देण्यात येत आहे. त्यामुळे पाटी हरवली किंवा त्याचा गैरवापर झाला तर याची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.नागरिकांचे हेलपाटेउच्च सुरक्षा नंबर पाटीबाबत ग्रामीण भागात लुटमार सुरू आहे. सुरक्षा नंबर प्लेटची नोंदणी करण्यापासून ते बसविण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी लूटच सुरू आहे. ग्रामीण भागात अनेक नागरिकांना ऑनलाइन अर्ज करण्याची माहिती नाही. त्यामुळे अर्ज करण्यासाठी १०० ते २०० रुपये लागत आहेत. ग्रामीण भागात कंपन्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणीच फिटमेंट सेंटर आहेत. त्यासाठी नागरिकांना ६० ते ७० किलोमीटर जावे लागते.

एचएसआरपी बसवण्याचे काम वेगाने सुरू असून, राज्यात एक हजार ७०० फिटमेंट सुरू करण्यात आले आहे. शिवाय प्रत्येक तालुक्यात फिटमेंट सेंटर सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आली आहे. वाहनधारकांनी ३० जूनपर्यंत नंबरप्लेट बसवून घ्यावी.- विवेक भीमनवार, आयुक्त, परिवहन

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसRto officeआरटीओ ऑफीस