शहरं
Join us  
Trending Stories
1
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
2
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
3
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
4
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
5
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्याधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
6
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
7
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
8
खासदार विशाल पाटलांना भाजपकडून ऑफर, चंद्रकांत पाटील म्हणाले, "एक चांगला माणूस यावा, यासाठी..."
9
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
10
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
11
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
12
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
13
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!
14
डॉ. वळसंगकर प्रकरणाला नवं वळण? आरोपी मनीषा हिला होती वळसंगकर कुटुंबातील वादाबाबत त्या गोष्टींची माहिती 
15
"कुठल्याही भाषेला विरोध नाही पण...", मनसेच्या हिंदी भाषा सक्ती विरोधानंतर मराठी अभिनेत्री स्पष्टच बोलली
16
ट्रम्प यांचं एक वक्तव्य गुंतवणूकदारांना भोवलं? अमेरिकन बाजार आपटला; डॉलरही घसरला
17
रेस्टॉरंट वेटर ते क्रिकेट अंपायर...! IPL मध्ये दिसणारा हा मराठमोळा पंच कोण आहे?
18
नाना पाटेकर घटस्फोट न घेताच पत्नीपासून राहतात वेगळे, यामागचं कारण आलं समोर
19
"मम्मी-पपा, मी आत्महत्या करतोय, यात तुमची काही चूक नाही"; 18 वर्षाच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य
20
अमृतपाल समर्थकांनी अमित शहांसह अनेक नेत्यांवर हल्ला करण्याचा कट रचला; चॅटमधून मोठा खुलासा

Pune Lok Sabha Result 2024: लाेकसभेची निवडणूक फिरली स्थानिक मुद्यावर; पुणेकरांच्या संमिश्र भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 11:31 IST

निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे....

पुणे : लाेकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने भाजपला चांगला धडा शिकविला आहे. धर्माचा, श्रद्धेचा मुद्दा चालला नाही. तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना बरोबर घेणे सामान्यांना रुचले नाही. यातही उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. या पार्श्वभूमीवर लाेकसभा निवडणूक निकालाबाबत ‘लाेकमत’ने पुणेकरांच्या भावना जाणून घेतल्या. निकालानंतर तरी कुठे काय चुकले, हे पाहणे गरजेचे आहे, अशा प्रतिक्रिया काही नागरिक व्यक्त करत आहेत; तर काहींनी भाजप पुन्हा सत्तेत आले हेच समाधानकारक आहे, अशी भावना व्यक्त केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल अनपेक्षित आहे. बोर्डात येणारे मूल केवळ उत्तम मार्क्स मिळून पास झाले, असे काहीसे झाले आहे. भाजप हे सगळ्यात अग्रेसर असणार हे तर माहीतच होते; पण उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचा निकाल धक्कादायक होता. कुठे काय चुकले हे पाहणे गरजेचे आहे. सत्तेत भाजपच आले हे समाधानकारक आहे. भाजपच्या राज्यात सुरक्षित वाटते.

- अमृता देशपांडे, गृहिणी

सत्तेत कुणीही येवो काही फरक पडत नाही; पण जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणे हे लोकप्रतिनिधींचे काम आहे. जनतेचे प्रश्न सोडून धर्म, जात या मुद्यावर निवडणुका लढविल्या जातात तेव्हा नक्की चाललंय काय? असा प्रश्न पडतो. सामान्यांना भेडसावणारे महागाई, बेरोजगारी, पाणी हे मुद्दे घेऊनच निवडणुकीत उतरणे आवश्यक आहे. भविष्यात खासदारांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीच काम करणे अपेक्षित आहे.

- सुनीता रमेश पांढरे, गृहिणी

सत्ताधाऱ्यांना जनतेने चांगलाच धडा शिकविला आहे. जनतेने काँग्रेसला हात दिला, तर भाजपला काठावर पास केले. त्यामुळे दोन्ही पक्षांसाठी तसे म्हटले तर आशादायी चित्र आहे. यापुढील निवडणुकीत स्थानिक मुद्देच महत्त्वाचे ठरणार आहेत. गावागावांमध्ये लोकप्रतिनिधींनी काय काम केले यावरच भविष्यात पक्षांचे मूल्यमापन केले जाणार आहे, असा इशारा जनतेने या निवडणुकीतून दिला आहे.

- सोमनाथ राऊत, चार्टर्ड अकाउंटंट

महाराष्ट्रात ज्या पद्धतीने फोडाफोडीचे राजकारण झाले, तेच मुळात जनतेला पटले नाही. नेत्यांची दमदाटी, पैशाचा माज, उन्माद सत्ताधाऱ्यांमध्ये वाढला होता. राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी सारखे घेतलेले मुद्देच योग्य होते. हे जनतेला पटले. आज गरीब आणि श्रीमंत अशी दरी वाढली आहे. ती कमी करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.

- जीवन निवृत्ती चाकणकर, शेतकरी

काहीही म्हणा मोदी की गॅरंटीला धक्का लागला. विरोधी पक्षालाही चान्स मिळाला. एकाधिकारशाही चालणार नाही हे मतदारांनी दाखवून दिले आणि लोकशाहीला मजबूत केले.

- अरुणा उदय माने, गृहिणी

निवडणुका म्हटले की चढ-उतार येतातच. म्हणून मतदार दुरावत नाहीत. भाजपचा एक पारंपरिक वर्ग आहे. भाजपचा ४०० पारचा नारा यशस्वी झाला नसला तरी २४० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे निम्मी जनता मोदी यांच्याबरोबर आहे. तिसऱ्यांदा मोदीच पंतप्रधान होतील, याची आम्हाला खात्री आहे.

- केतकी पाध्ये

आता मतदार जागृत झाला आहे. लोकप्रतिनिधी चुकला तर मतदार चुका दाखवून देतात. मतदारांना गृहीत धरता येत नाही. तरीही लोकांच्या मनावर मोदींनी घेतलेली पकड कमी झालेली नाही. चुका सुधारून पुन्हा सत्तेत आले तर जनता नक्कीच स्वीकारेल.

- प्रकाश कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :ravindra dhangekarरविंद्र धंगेकरmurlidhar moholमुरलीधर मोहोळLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालPuneपुणे