शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा;जुन्नरमधील शेतकऱ्यांचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 13:41 IST

सर्व बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवून देण्याची गरज

आळेफाटा : पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग कायमस्वरूपी रद्द करावा व रद्द झाल्याची राज्य सरकारने अधिसूचना काढावी या आग्रही मागणीसाठी व पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी जुन्नर तालुक्यातील राजुरी येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बैठक घेण्यात आली.यावेळी शेतकरी संघर्ष समितीचे प्रमुख बाळासाहेब औटी म्हणाले की संघर्ष समितीच्या वतीने अनेक आंदोलने केली. परंतु सरकारला आमचा विरोध दिसत नसल्याने तीव्र आंदोलन उभे करावे लागणार असून यासाठी सर्व बाधित शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून आपली एकजूट दाखवून देण्याची गरज आहे. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधी, मंत्री यांच्या दारात सविनय पद्धतीने हट्टाग्रह आंदोलन करण्याचा कडक इशारा देण्यात आला.दरम्यान २७ ऑगस्ट २०२४ पासून औद्योगिक महामार्ग रद्द करावा व विविध मागण्यांसाठी अनेक तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांनी राजुरी या ठिकाणी बेमुदत उपोषण सुरू केले होते. सदर उपोषणास शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे व जुन्नर तालुक्याचे तत्कालीन आमदार अतुल बेनके यांनी संबंधित मंत्री महोदय व महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक यांच्याशी संयुक्त बैठक घेऊन हा प्रश्न चर्चा करून त्वरित मार्गी लावू, असे आश्वासनानंतर आंदोलन थांबविण्यात आले होते. तसेच तत्कालीन सहकार मंत्री नामदार दिलीप वळसे पाटील यांच्याशी संघर्ष समितीचे शिष्टमंडळाला बरोबर झालेल्या बैठकीमध्ये नियोजित पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गाला जुन्नर व आंबेगाव शिरूर संगमनेर तालुक्यात शेतकऱ्यांचा असणारा विरोध लक्षात घेता महामार्ग रद्द होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची फाईलवर स्वाक्षरी झाली आहे. येत्या चार ते पाच दिवसात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकार हा महामार्ग रद्द झाल्याचे अधिसूचना काढणार आहे, असे आश्वासन १५ सप्टेंबर २०२४ रोजी पुणे-नाशिक औद्योगिक महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने शिष्टमंडळाला वळसे पाटील यांनी आश्वासन दिल्याने पुकारलेले आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले होते.औद्योगिक महामार्ग संघर्ष समितीच्या या बैठकीला राजुरी गावचे उपसरपंच, ज्ञानेश्वर शेळके, शेतकरी संघर्ष समितीचे सहप्रमुख वल्लभ शेळके, समितीचे समन्वयक एम. डी घंगाळे, मोहन नाईकवाडी, गोविंद हाडवळे, प्रतीक जावळे, दिलीप जाधव, अविनाश हाडवळे तसेच खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर तालुक्यातील शेतकरी समितीच्या सदस्य उपस्थित होते.आंदोलनावर ठामगेली पाच महिने होऊन देखील पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द झाल्याची अधिसूचना निघाली नाही म्हणून बाधित शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरले आहे. त्यामुळे जुन्नर, आंबेगाव, खेड, संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा निर्धार बैठकीत व्यक्त केला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक