शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

रेशनच्या प्राधान्य योजनेत सुमारे ६ लाख लाभार्थी वाढले, जिल्हानिहाय कोटा निश्चित

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:50 IST

- काही जिल्ह्यांच्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ, तर काही जिल्ह्यांत घट झाली

पुणे : केंद्र सरकारने शिधापत्रिकेवर धान्यवाटप करताना राज्याला अंत्योदय योजनेचे शिधापत्रिकाधारक आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेचे लाभार्थी यांची संख्या निश्चित केली आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत अंत्योदय योजनेसाठी एकूण शिधापत्रिकांच्या संख्येत कोणताही बदल केलेला नसला तरी प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत लाभार्थ्यांच्या संख्येत सुमारे ६ लाखांनी वाढ झाली आहे. त्यानुसार आता जिल्ह्यांना मंजूर केलेल्या शिधापत्रिकांना या धान्यवाटपात समाविष्ट करून घेता येणार आहे. यात काही जिल्ह्यांच्या शिधापत्रिका आणि लाभार्थ्यांच्या संख्येत वाढ, तर काही जिल्ह्यांत घट झाली आहे.

राज्य सरकारने अनेकदा निरनिराळ्या पद्धतीने धान्याच्या कोट्यात बदल करून देखील कोटा पूर्णपणे वितरित होत नसल्याचे दिसून आले आहे. शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांच्या संख्येनुसार विनावापर कोटा शिल्लक असल्याचे निदर्शनास आले आहे.

त्यामुळे शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवरील अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्याचे राज्य सरकारने ठरविले आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्याची राज्यात १ फेब्रुवारी २०१४ पासून अंमलबजावणी सुरू आहे. शिधापत्रिकाधारकांकडून त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न व प्रत्येक सदस्यांचा आधार क्रमांक यासह कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती दर्शविणारे सुधारित हमीपत्र देखील भरून घेण्यात येत आहे.

राज्यासाठी दिलेल्या एकूण कोट्याची पूर्तता होत नसल्याने अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थी सदस्यांचा सुधारित इष्टांक देण्याच्या दृष्टीने शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीवर डिजिटायझेशन करण्यात आलेल्या अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका व प्राधान्य कुटुंब लाभार्थी संख्येच्या आधारे राष्ट्रीय अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत जिल्हानिहाय सुधारित इष्टांक देण्यात आला आहे.

केंद्र सरकारने दिलेल्या कोट्यानुसार राज्यात २५ लाख ५ हजार ३० अंत्योदय योजनेतील शिधापत्रिका निश्चित करण्यात आल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत ५ कोटी ९८ लाख १२ हजार ७९६ इतकी आहे. गेल्या वर्षी अंत्योदय योजनेची संख्या कायम होती. तर प्राधान्य योजनेत ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ लाभार्थी होते. यंदा त्यात ५ लाख ९६ हजार ७६५ लाभार्थ्यांची वाढ करण्यात आली आहे.

पुणे जिह्यातील अंत्योदय योजनेसाठी ९ हजार १०० पत्रिकांची अतिरिक्त मागणी करण्यात आली होती. मात्र, राज्य सरकारने ३१६ पत्रिका वाढवून दिल्या आहेत. तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेत सुमारे अडीच लाख लाभार्थी वाढवून मिळावेत अशी मागणी होती. प्रत्यक्षात ४८ हजार २४१ लाभार्थी संख्या वाढवून मिळाली आहे. ही वाढीव संख्या समप्रमाणात १३ तालुक्यांना विभागून देण्यात येईल. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारीपुणे शहरात अंत्योदय योजनेसाठी ५०० पत्रिकांची मागणी असताना ४५ ची वाढ आहे, तर प्राधान्य योजनेत ५ लाख लाभार्थ्यांची वाढीव मागणी करण्यात आली होती. त्यात केवळ २८ हजार ८९६ लाभार्थ्यांची वाढ देण्यात आली आहे. - प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणेे शहर 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रfoodअन्न