शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

अनेक वर्षांपासून अडकलेले शेतकऱ्यांचे रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

By नितीन चौधरी | Updated: March 16, 2025 14:01 IST

जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले करण्यात आले

पुणे : शेतजमिनींमधील बंद झालेले वहिवाटीचे रस्ते मोकळे करण्यासंदर्भात तहसीलदारांचे अधिकार आता नायब तहसीलदारांनादेखील देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी घेतला आहे. त्यामुळे रस्त्यांच्या प्रकरणांवर जलदगतीने सुनावणी होऊन ते शेतकऱ्यांना वहिवाटीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून अडकलेले रस्ते जिल्हा प्रशासनाने खुले केले आहेत. जिल्ह्यात गेल्या महिनाभरात १४६ किलोमीटरचे ११७ रस्ते खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रिटिश काळात पारंपरिक वहिवाटीत असलेले रस्ते नकाशांवर आणण्यात आले. त्यानंतर आतापर्यंत अशा रस्त्यांना नकाशावर स्थान मिळालेले नाही. पूर्वी जमिनींना व्यावसायिक दर नव्हता. जमीनमालकदेखील वहिवाटीत असणाऱ्या रस्त्यांचा शेजारील शेतकऱ्यांना सहज वापर करू देत होते. कालांतराने जमिनींचे भाव गगनाला भिडल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून जाणारे रस्ते बंद केले. या संदर्भात प्रत्यक्ष रस्त्याचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे तक्रारी दाखल केल्या. मात्र, काही प्रकरणे न्यायालयात असल्याने तहसीलदारांनाही त्यात निर्णय देता येत नाही.

राज्य सरकारच्या मामलेदार कोर्ट १९०५च्या कायद्यातील कलम ५ नुसार तहसीलदारांनी अशा प्रकरणांमध्ये निर्णय घेणे अपेक्षित असते. तहसीलदारांकडील कार्यभार बघता त्यांना अशा प्रकरणांमध्ये सुनावणी घेण्यास बराच अवधी लागत असल्याचे दिसून आले. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदारांच्या या अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार आता हे अधिकार तहसीलदारांसह नायब तहसीलदारांनादेखील देण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ते अडवणुकी संदर्भातील प्रकरणे वेगाने मार्गी लागणार आहेत.

नकाशातील रस्त्यांसंदर्भात तक्रारी असल्यास भूमिअभिलेख अधिकार विभागाकडून त्याची मोजणी केली जाते. एक व दोन बिंदू रस्ता असल्यास हा रस्ता संबंधित जमीनमालकाच्या मूळ क्षेत्रातच मोजला जातो. मात्र, दोन रेषांनी दाखविण्यात आलेला रस्ता संबंधित सर्व्हे क्रमांकाच्या व्यतिरिक्त क्षेत्रात मोजला जातो. भूमिअभिलेख विभागाने अशा स्वरूपाची मोजणी केल्यानंतर रस्त्याची प्रत्यक्ष लांबी रुंदी कळते. एखादा शेतकरी प्रत्यक्ष शेतातून रस्ता देण्यास असहमत असल्यास त्याच्या बांधावरून रस्त्याची आखणी केली जाते. अशा प्रकरणांमध्ये संबंधित शेतकरी व व गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्रित घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे काम तहसीलदार करत असतात. 

तहसीलदार अशी सर्व प्रकरणे चालवू शकत नसल्याने आता नायब तहसीलदारांनादेखील अशी प्रकरणे चालवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांनी प्रदान केले आहे. - नामदेव टिळेकर, उपजिल्हाधिकारी, कुळकायदा शाखा

सरकारच्या शंभर दिवसांच्या कार्यक्रमांमध्ये ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय वहिवाटीचा रस्ता आहे. असे रस्ते खुले करण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. - सुहास मापारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी 

तहसीलदार-- रस्त्यांची संख्या-- लांबी (किमी)

आंबेगाव ४--४.४३

इंदापूर १२--२१

खेड २१--१६.८५

जुन्नर ८--८

दौंड ५--५.८

बारामती १०--६.३

भोर ८--९

मावळ १४--२३.८

मुळशी ८--८

शिरूर १५--३७

लोणी काळभोर--६--३

हवेली ३--३

वेल्हे--३--३.८

एकूण ११७--१४५.९८

 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रAgriculture Schemeकृषी योजनाAgriculture Sectorशेती क्षेत्रAgricultural Science Centerकृषी विज्ञान केंद्र