शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रोजगार वाचवायला नदीपात्र गेले अन्...; विजेचा शॉक लागून तीन कामगारांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 12:27 IST

रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मीळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

संतोष गाजरे 

कात्रज : पुणे शहरात मागील तीन दिवसापासून संततधार सुरू असून पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले असून अनेक भागात रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. डेक्कन परिसरात असणाऱ्या भिडे पूल परिसरातील झेड ब्रिज खाली नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला आहे. त्यामुळे नदी पात्रात असलेल्या अंडा भुर्जी स्टॉल सुरक्षित ठिकाणी हलवण्याकरता गेलेल्या तिघांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्यांना लागलीच हॉस्पिटल येथे दाखल केले. ही घटना पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. रात्र गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

डॉक्टरांनी विजेचा शॉक लागलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. तसेच सीपीआर देखील तातडीने दिला. परंतु उपचारास प्रतिसाद देत नसल्याने पाच वाजता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले.

अभिषेक अजय घाणेकर (वय २५ )राहणार पुलाची वाडी डेक्कन, आकाश विनायक माने (वय २१) राहणार पूलाची वाडी डेक्कन, शिवा जिदबहादुर परिहार ( वय १८ ) नेपाळ, अशी मृत तिघांची नावे आहेत. तसेच सध्या जोराचा पाऊस सुरू असून पाण्यामध्ये विजेचे तारा तसेच अन्य उपकरणे दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पोलिसांनी तसेच महानगरपालिकेने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस