शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

लोकसहभागातून सुटतील प्रश्न

By admin | Published: February 21, 2017 2:35 AM

ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे

तळेगाव दाभाडे : ग्रामीण भागातल्या औद्योगिक क्षेत्रांची प्रगती योजनाबद्ध रितीने झालेली नाही. योजना व अंमलबजावणी यामध्ये असलेल्या तफावतीमुळे प्रश्न निर्माण होत आहेत. लोकसहभागाने बरेच प्रश्न सुटतील, असे मत डॉ. संजय कप्तान यांनी व्यक्त केले. मावळ शिक्षण प्रतिष्ठान संचालित, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात गुणवत्ता सुधार योजनेतंर्गत वाणिज्य विभागाच्या वतीने ‘ग्रामीण भागातील औद्योगिक विकासातील आव्हाने’ या  विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचे आयोजन केले  आहे. उद्घाटन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर बीजभाषक डॉ. एस. व्ही. कडव्हेकर , सत्राचे अध्यक्ष डॉ. दत्तात्रय बाळसराफ, संस्थेचे उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्रा. वसंत पवार व महाविद्यालयाच्या स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्या स्नेहल बाळसराफ व प्रभारी प्राचार्य व चर्चासत्राचे आयोजक प्रा. श्रीकांत महाजन आदी उपस्थित होते. डॉ. कडव्हेकर म्हणाले, ‘‘ग्रामीण भागात औद्योगिकीकरण वेगाने होऊ शकते. कारण तिथे विचारांचा भ्रष्टाचार तुलनेने कमी आहे. गरज  आहे व्यावसायिक दृष्टिकोन बाळगण्याची.’’ अध्यक्षीय मनोगतात डॉ. बाळसराफ यांनी स्वत:चा उद्योग सुरू करण्याचे आवाहन केले. नंतरच्या सत्रांमध्ये अर्चना आहेर, डॉ. अश्विनी सोवनी या प्रमुख वक्त्यांनी विचार मांडले. डॉ. जे. डी. टाकळकर व डॉ. ए. एम. अग्रवाल सत्राचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रा. श्रीकांत महाजन यांनी प्रास्ताविक केले. प्रा. किसन पाटील व प्रा. अशोक कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. विनया केसकर यांनी आभार मानले. प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी चर्चासत्राचे आयोजन केले.(वार्ताहर)