शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack: हेच ते तीन नराधम! निरपराध भारतीयांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांचं चित्र प्रशासनाकडून जारी
2
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
3
"हा देशातील दोन समाजांमध्ये वाद निर्माण होऊन देश अस्थिर करण्याचा कट’’, विजय वडेट्टीवार यांचा दावा   
4
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
5
पहलगाम इथं पर्यटकांवर हल्ला करणारे दहशतवादी भारतात कसे घुसले?; समोर आला मार्ग
6
दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमधील पर्यटनाचं काय होणार? स्थानिक लोकांचं सर्वाधिक नुकसान
7
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
8
Pahalgam Attack Update : "भाऊ, वहिनी मॅगी खात होते, गोळी लागताच रक्ताच्या थारोळ्यात..."; काळजात चर्र करणारी घटना
9
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
10
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी स्तब्ध पडून राहिली नवी नवरी
11
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
12
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
13
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
14
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
15
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
16
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
17
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
18
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
19
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
20
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर

राहुल गांधी यांना पुणे न्यायालयात प्रत्येक तारखेस उपस्थित रहाण्याची गरज नाही; गांधी यांचा अर्ज अटी शर्तींवर केला मंजूर  

By नम्रता फडणीस | Updated: February 18, 2025 19:24 IST

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य प्रकरण 

पुणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वकिलांमार्फत दाव्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी असा अर्ज न्यायालयात दाखल केला होता. विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांनी मंगळवारी ( दि. १८) अटी शर्तीवर गांधी यांचा अर्ज मंजूर केला.स्वातंत्र्यवीर सावकर यांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींविरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला आहे. याप्रकरणात राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्यासाठी दि. १० जानेवारीची तारीख दिली होती. त्यानुसार राहुल गांधी हे न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरसिंग द्वारे हजर झाले होते. मानहानीच्या दाव्यात राहुल गांधी यांना वैयक्तिक 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. दरम्यान, राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी या दाव्यात राहुल गांधी यांना सुनावणी दरम्यान न्यायालयात स्वतः हजर राहण्यापासून कायमस्वरूपी सूट मिळावी असा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आरोपी त्याच्या ओळखीवर वाद घालणार नाही, आमच्या वकिलांच्या अनुपस्थितीत या प्रकरणातील पुरावे नोंदविले गेले आहेत असा आक्षेप घेणार नाहीत. तसेच सुनावणीदरम्यान आरोपीचे वकील आरोपीला वेळोवेळी आवश्यक सूचना देतील. अशा अटी शर्तींवर विशेष न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज मंजूर केला.दाव्याची पुढील सुनावणी "समरी ट्रायल" ऐवजी "समन्स ट्रायल" म्हणून घ्यावीसावरकर यांचे ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवण्यात फार मोठे योगदान होते असे सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या त्यांच्या फिर्यादी मध्ये नमूद केलेले आहे. सावरकरांचे स्वातंत्र्य मिळवण्यातील योगदान व त्या अनुषंगाने अजून बऱ्याच काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना न्यायालया समोर येणे राहुल गांधी यांना नैसर्गिक न्याय मिळण्याच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या आहेत. म्हणून कायद्यातील तरतुदींनुसार या खटल्याची पुढील सुनावणी "समरी ट्रायल" ऐवजी "समन्स ट्रायल" म्हणून घ्यावी. सद्य परिस्थितीत न्यायालयात या खटल्याची नोंद न्यायालयाचे निबंधक यांनी चुकीने "समरी ट्रायल" अशी केली आहे.खटल्याच्या नोंदीचे परिवर्तन फौजदारी न्याय संहिता कलम २५८ नुसार "समरी ट्रायल"ऐवजी "समन्स ट्रायल" मध्ये करावे. म्हणजे या खटल्यात बचाव पक्षाला विस्तृतपणे सखोलपणे फिर्यादी यांचा उलट तपास घेता येईल. ब्रिटिशकालीन स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्त्वाचे ऐतिहासिक दस्तऐवज या खटल्याच्या पुराव्या कामी न्यायालयासमोर सुनावणी दरम्यान न्यायालयात मागवता येतील. म्हणून "समन्स ट्रायल" नुसार या खटल्याची सुनावणी व्हावी असा अर्ज राहुल गांधी यांचे वकील ॲड. मिलिंद पवार यांनी दाखल केला. ॲड. पवार यांनी दाखल केलेल्या अर्जावर फिर्यादी सात्यकी सावरकर यांचे लेखी स्वरूपात म्हणणे न्यायालयाने मागविले असून, त्यावर खटल्याची पुढील सुनावणी दि. २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRahul Gandhiराहुल गांधीCourtन्यायालय