शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
2
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
3
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
4
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
5
या गावातील प्रत्येकाकडे स्वतःचे विमान; साखर-चहा पत्ती आणण्यासाठी विमानाचा वापर, कारण...
6
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
7
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
8
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
9
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
10
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
11
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
12
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
13
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
14
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
15
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
16
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
17
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
18
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
19
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
20
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं

राहुल गांधींनी काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे; राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला

By नितीन चौधरी | Published: November 03, 2022 7:43 PM

महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा

पुणे: राहुल गांधी यांना यापूर्वीच मी सल्ला दिला आहे की, काँग्रेस छोडो कार्यक्रमाकडे लक्ष द्या. विविध योजनांतून सामान्य नागरिक पक्षाशी जोडला जातो. पण यात्रेतून जोडला जात नाही, असा टोला राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. संपूर्ण देशात काँग्रेसची वाताहात झाली असून ही यात्रा आता महाराष्ट्रात येत असली तरी ती 'भारत जोडो' यात्रा नव्हे, तर 'पुढारी जोडो' यात्रा आहे, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. 

पुण्यात विधानभवनात एका बैठकीसाठी ते आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते सरसावले आहेत. याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘‘काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. काँग्रेसची ही भारत जोडो यात्रा नसून ती पुढारी जोडो यात्रा झाली आहे. त्यापेक्षा वेगळे महत्त्व त्याला राहिले नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात काँग्रेसची अवस्था कशी झाली हे पाहिले आहे. मंत्रीपदासाठी सत्तेत राहायचे. राज्याची आणि देशाची पातळीवर सारखीच अवस्था आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून त्यांना आता कोणी गृहीत धरत नाही. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमुळे फारसा फरक पडेल असे वाटत नाही.”

गुजरातमध्ये कॉंग्रेसला पुन्हा सत्ता मिळेल असा दावा केला जात आहे, याबाबत ते म्हणाले, “गुजरातमध्ये निरंतरपणे भाजपची सत्ता राहिली आहे.देशात विकासाचे मॉडेल म्हणून गुजरातकडे पाहिले जाते. नरेंद्र मोदी यांना जनाधार आहे. यंदाच्या गुजरातमधील निवडणुकांमध्ये सुद्धा जनता मोदी यांच्या पाठीशी असेल त्यात काही तिळमात्र शंका नाही.” तर राज्यातील उद्योग गुजरातमध्ये पळविले जात असल्याच्या टीकेला उत्तर देताना, उद्योगमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे श्वेतपत्रिका येऊ देत. त्यानंतर वस्तुस्थिती समोर येईल. विरोधकांनी टीकेचा सूर जो सुरु केला आहे सत्ता गेल्याचा वैफल्य आहे. त्यातून बेछूट आरोप सुरु आहेत. राज्याचे काम उत्तम सुरु आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :PuneपुणेRahul Gandhiराहुल गांधीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलPoliticsराजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस