शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

औरंगाबाद घटनेनंतर रेल्वे सतर्क ; रेल्वेमार्गांवर वाढविली गस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 18:09 IST

औरंगाबाद येथे मजूरांना मालगाडीने चिरडल्याने आता पुणे रेल्वे विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. रेल्वे मार्गावर गस्त वाढविण्यात येत आहे.

पुणे : औरंगाबाद येथील घटनेनंतर पुणे विभागातील सर्व रेल्वे मार्गांवर लोकांनी येऊ नये यासाठी मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात आली आहे. लोहमार्ग पोलिस, रेल्वे सुरक्षा दलासह सर्व विभागांना सतर्क राहण्याबाबत सुचना दिल्या आहेत. तसेच चालकांनाही अत्यंत काळजीपुर्वक गाडी चालविण्याच्या सुचना देण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक रेणु शर्मा यांनी ‘लोकमत’ला दिली.

औरंगाबाद येथे शुक्रवारी पहाटे मालगाडीने १६ मजूरांना चिरडल्यानंतर रेल्वे यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तसेच त्याच दिवशी सायंकाळी उरळी ते लोणी स्थानकादरम्यान मालगाडी चालकाच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली. सुमारे १५ ते २० जण रेल्वेमार्गावरच ठाण मांडून बसले होते. पण चालकाने वेळीच ब्रेक लावल्याने त्यांचे प्राण वाचले. यापार्श्वभुमीवर रेल्वे प्रशासनाने सर्वच मार्गांवर गस्त वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे विभागातील पुणे ते लोणावळा, पुणे ते दौंड आणि पुणे ते मिरज या मार्गांवर गस्त वाढविली आहे.

याविषयी बोलताना रेणु शर्मा म्हणाल्या, मागील दोन दिवसांपासून सर्व मार्गांवरील गस्त वाढविण्यात आली आहे. आरपीएफ, अभियांत्रिकी, संचलन यांसह विविध विभागांना याबाबत सुचना दिल्या आहेत. लोहमार्ग पोलिसांकडूनही गस्त घालण्यात येत आहे. प्रामुख्याने चालकांना सतर्क राहून गाडी चालविण्यास सांगण्यात आले आहे. सध्या मालगाडी आणि विशेष प्रवासी गाड्या सुरू आहेत. त्यामुळे मार्गावरून कोणीही चालताना दिसले तर त्यांना तातडीने दुर केले जाईल. त्यांना जीव धोक्यात न घालण्याबाबत सांगून तिथून हटविले जात आहे. रस्त्यानेच पायी जाण्याच्या सुचना दिल्या जात आहेत.

रस्त्यानेच प्रवास करालॉकडाऊनमुळे रेल्वे वाहतुक पुर्णपणे बंद असल्याचे लोकांना वाटत आहे. पण पहिल्या दिवसापासून केवळ प्रवासी वाहतुक बंद आहे. मालगाड्या नियमितपणे धावत आहेत. तसेच काही दिवसांपासून श्रमिक स्पेशल गाड्याही सोडण्यात येत आहेत. त्यामुळे कोणत्या ट्रॅकवरून कोणती गाडी कधी येईल, हे सांगता येत नाही.  पण परराज्यात जाणारे अनेक मजुर रेल्वे ट्रॅकवरूनच पायी जात आहेत. तसेच विश्रांतीसाठीही ट्रॅकचाच आधार घेत आहेत. याच कारणामुळे शुक्रवारची घटना घडली आहे. त्यामुळे रेल्वेने लोकांना रेल्वे ट्रॅकवरून किंवा जवळून न चालून जीव धोक्यात न घालता रस्त्यानेच चालावे, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :railwayरेल्वेAccidentअपघातPoliceपोलिस