शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
3
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
4
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
5
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
6
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
7
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
8
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
9
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
10
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
11
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
12
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
13
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
14
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
15
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
16
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
17
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
19
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
20
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप

रेल्वेसेवा दुस-या दिवशीही कोलमडली; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्यांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:44 AM

मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणा-या लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या.

पुणे : मुंबईतील मुसळधार पाऊस आणि घसरलेल्या दुरांतो एक्सप्रेसमुळे सलग दुस-या दिवशी रेल्वे वाहतूक कोलमडून गेली. मुंबईला जाणाºया लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या अर्ध्यातूनही माघारी फिरविण्यात आल्या. पुण्यातून मुंबईकडे जाणा-या डेक्कन, इंटरसिटी व इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्याही रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. उद्या गुरूवारी काही प्रमाणात ही स्थिती सुधारेल, अशी शक्यता रेल्वे अधिकाºयांनी बोलून दाखविली.आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने पहाटेपासूनचे या मार्गावरील अनेक गाड्या पुणे मार्गावरून रवाना करण्यात आले. काही गाड्या रद्द तर काही गाड्यां मध्येच थांबविण्यात आले. मुंबईकडे जाणाºया अनेक गाड्या ठिकठिकाणी थांबविण्यात आल्याने सकाळी मध्य रेल्वे मार्गावर कोंडी झाली.बुधवारी चेन्नई-सीएसटी एक्सप्रेस, कोइम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस, हुबळी एक्स्प्रेस, हुसेनसागर एक्स्प्रेस, हैद्राबाद-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई नागरकोईल एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या.तिकीट रेल्वेचे; प्रवास एसटीचानाशिक : आसनगावजवळ दुरांतो एक्स्प्रेसला मंगळवारी झालेल्या अपघातानंतर इगतपुरी येथे थांबविण्यात आलेल्या तीनही एक्स्प्रेसमधील प्रवाशांना एस.टी. बसेसद्वारे कल्याणपर्यंत पोहोचविण्यात आले. रेल्वेचे तिकीट दाखवून सुमारे सातशेपेक्षा अधिक प्रवाशांना कल्याणपर्यंत पोहचणे शक्य झाले. दुरांतो एक्स्प्रेस अपघात व मुंबईतील मुसळधार पाऊस यामुळे मनमाड, नाशिक येथून मुंबईला जाणाºया प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. नाशिक रोडला अडकलेल्या प्रवाशांना स्वखर्चाने एसटीचे तिकीट काढावे लागले असले तरी इगतपुरीतील प्रवाशांना सुमारे १५ बसेसद्वारे कल्याणपर्यंत रेल्वेच्याच तिकिटावर नेण्यात आले. रेल्वे प्रशासनाने तातडीची उपाययोजना म्हणून महामंडळाला भाडे देण्याची तयारी दर्शविल्याची माहिती महामंडळाच्या अधिकाºयांनी दिली.मध्य रेल्वेने गुरूवारीतपोवन एक्स्प्रेस रद्द केली आहे. कोयना एक्स्प्रेस मुंबई-पुणे दरम्यान रद्द करण्यात आली असून गुरूवारी पुणे स्थानकातूनच कोल्हापूरकडे रवाना केली जाईल. बुधवारी सायंकाळी ६.४५ वाजता सुटणारी पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस गुरूवारी मध्यरात्री १.४५ वाजता सोडण्यात येणार होती.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वे