शहरं
Join us  
Trending Stories
1
वैद्यकीय क्षेत्रातील 'नोबेल' जाहीर! अमेरिकन शास्त्रज्ञ व्हिक्टर अम्ब्रोस, गॅरी रुवकुन यांची निवड
2
Maharashtra Vidhan Sabha: किरीट सोमय्यांवर आता भाजपाने सोपवली नवी जबाबदारी!
3
हर्षवर्धन पाटील यांचा पक्षप्रवेश होताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, "इंदापूरचे हे महाधनुष्य..."
4
'सुट्टी'वरून राडा! शिक्षिकेची सहकारी शिक्षकाला मारहाण; व्हिडीओ व्हायरल
5
रामराजे निंबाळकरांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली? शरद पवारांचं इंदापुरात मोठं विधान
6
रिल बनवत होता ड्रायव्हर, तेवढ्यात विजेच्या खांबावर आदळली बस, ३ प्रवाशांचा मृत्यू 
7
कोहली, धोनीपेक्षा भारी ठरला हार्दिक पांड्या; सेट केला सिक्सरसह मॅच फिनिश करण्याचा नवा रेकॉर्ड
8
6 दिवसात ₹20 लाख कोटी स्वाहा...! भारत सोडून कोण-कोण जातय चीनला?
9
SBI मध्ये होणार १० हजार पदांसाठी भरती; कधी जारी केली जाणार अधिसूचना?
10
पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! Team India देखील जाणार? PCB ने सांगितलं कारण
11
कोलकाता प्रकरणी मोठा खुलासा! "महिला डॉक्टरवर सामुहिक बलात्कार..." CBI'ने चार्जशीट केले दाखल
12
Kapil Honrao : "मी १० वर्ष थिएटर, साडेतीन वर्ष सीरियल करून..."; सूरज जिंकताच अभिनेत्याच्या पोस्टने वेधलं लक्ष
13
"कुठे आहेत ते... त्यांना बोलवा", काँग्रेस आमदार मंचावरूनच सरकारी अधिकाऱ्यांवर संतापले
14
सांगलीत आजी-माजी खासदार समोरासमोर; भरसभेत जुंपली, तणाव वाढला, नेमकं काय घडलं?
15
ही भविष्यवाणी खरी झाल्यास २०२५ पासून होणार मानवाच्या अंताची सुरुवात, नेमकं काय घडणार
16
संजय शिरसाटांचा गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंचं सर्व आधीच ठरलं होतं, मग आटापिटा कशाला?
17
Gold Price: सोनं खरेदीच्या विचारात आहात? मग थोडं थांबा, ₹५००० पर्यंत घरण्याची शक्यता, 'या'वेळी येणार करेक्शन
18
पाकिस्तानातील हरवलेले मुख्यमंत्री सापडले! थेट विधासभेत लावली हजेरी, घटनाक्रमही सांगितला
19
अखेर भारत-मालदीवचा वाद मिटला; मुइज्जू यांच्या भेटीनंतर पीएम मोदींचे मोठे वक्तव्य, म्हणाले...
20
बोईंग 737 च्या रडर जॅममुळे DGCA चा ताण वाढला, सर्व विमान कंपन्यांना दिला इशारा

भातपिकाला पावसाने जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2018 12:16 AM

पंधरवड्यानंतर पुनरागमन : बळीराजा आनंदी

भोर : सुमारे १५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भोर तालुक्यात दोन दिवस दमदार पाऊस झाला. भातपिकाला त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. भात हे भोर तालुक्यातील प्रमुख पीक आहे. भाताची ५० हेक्टरवर रोपवाटिका करून सुमारे ७५०० हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस गायब झाल्याने भातखाचरातील पाणी आटले होते. परिणामी पिकाला अन्नद्रव्याची कमतरता जाणवून वाढीवर विपरीत परिणाम होत होता.

पिकावर विषाणूजन्य करपा व बुरशीजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याची भीती असल्याने शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत होते. मात्र गेल्या दोन दिवसांत रात्री झालेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. तालुक्यात इंद्रायणी, बासमती, फुले समृद्धी, रत्नागिरी २४, कर्जत आंबेमोहोर, तामसाळ या हळव्या आणी गरव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. सध्या भात पोसण्याची वेळ असताना पावसाअभावी डोंगर उतारावरील झरे आटले, तसेच ओढ्या, नाल्यांचे पाणीही आटले होते. त्यामुळे भातावर काही ठिकाणी जिवाणूजन्य करपा व काही भागात विषाणूजन्य करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. अनेक ठिकाणी भाताच्या ओंब्या बाहेर पडत असताना पाणी नसल्याने दाणे भरण्यास अडचण होणार होती.अचानक पावसाने मारली दडीतालुक्यात भाताची ७५०० हेक्टरवर लागवड झाली असून त्यातील ५० एकरवर यंत्राद्वारे लागवड करण्यात आली आहे. वेळेवर पाऊस झाल्याने १०० टक्के भाताची लागवड झाली होती. भाताचे पिक जोमात होते. त्यामुळे उत्पादनात वाढ होईल, असे वाटत असताना अचानक पावसाने दडी मारली होती. पिकावर त्याचे दुष्परिणाम जाणवत होते.

टॅग्स :Puneपुणे