शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
2
मध्यरात्री १२.३० पर्यंत चालली महायुतीची बैठक; एकनाथ शिंदेंची मोजकीच प्रतिक्रिया...
3
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...
4
"भाजपशी संबंधित प्रत्येक आरोपी फरार कसा होतो?", देशमुखांनी फडणवीसांना घेरलं
5
खळबळजनक! फ्रिजमध्ये ३० तुकडे; महालक्ष्मीच्या हत्येचं बंगालशी कनेक्शन, 'तो' मिस्ट्री मॅन कोण?
6
Baramati Vidhan Sabha 2024 :जय पवार विधानसभा निवडणूक लढवणार? अजित पवार म्हणाले...
7
राँग नंबरवाली Love Story! घरातून पळाली, मंदिरात प्रियकरासोबत लग्न केले, ५ महिन्यांनी...
8
श्राद्ध भोजनाने दोष लागतो का? श्राद्धाचे जेवण जेवावे की नाही? वाचा, दत्तगुरु, नवनाथांची कथा
9
Zerodha News: सेबीच्या 'या' नियमांमुळे झिरोदाला टेन्शन; महसूलात ५०% घसरणीची व्यक्त केली शक्यता 
10
भाजपातील पिता पुत्र जोडीनं घेतली शरद पवारांची भेट; 'तुतारी' हाती घेण्याची शक्यता
11
मोठ्या नेत्याने पक्षात येण्याची इच्छा व्यक्त केली; जयंत पाटलांचा गौप्यस्फोट
12
लेबनानमध्ये एअरस्ट्राइक केल्यावर हिज्बुल्लाचा इस्रायलवर निशाणा, लष्करी तळावर डागलं मिसाइल
13
IND vs BAN 2nd Test : कानपूरमध्ये स्वागतावेळी Virat Kohli चा संताप; म्हणाला, "मला फक्त..."
14
Video - पिटबुल बनला सुपरहिरो! किंग कोब्राशी झुंज देऊन वाचवला लहान मुलांचा जीव
15
भाविकांवर काळाने घातली झडप! कारचा झाला चेंदामेंदा, 7 जागीच ठार
16
टीव्ही-मोबाइल सहजरित्या रिपेअर होणार की नाही? आता खरेदी करतानाच याची माहिती मिळणार, जाणून घ्या
17
३ ग्रहांचे ६ राजयोग: ८ राशींना फायदा, नवीन नोकरीची ऑफर; परदेशातून लाभ, पद-पैसा वाढ!
18
बिबट्याच्या हल्ल्यात आठ वर्षीय मुलाचा मृत्यू; जुन्नर तालुक्यातील तेजेवाडी येथील घटना
19
अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याची पोस्ट; 'म्हणाला, 'कायद्याने झालं असतं तर...'
20
रोहित-विराट दोघांनी 'ती' मर्यादा ओलांडलीये! असं का म्हणाले कपिल पाजी?

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

By नितीन चौधरी | Published: July 11, 2022 8:35 PM

समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम

पुणे : बंगालच्या उपसागरावर ओडिशा किनारपट्टीवर तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तसेच अरबी समुद्रावर गुजरातपासून उत्तर केरळ किनारपट्टीपर्यंत तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे मध्य भारत तसेच राज्यात सध्या पावसाचा जोर कायम आहे. या स्थितीमुळे राज्यात येत्या गुरुवारपर्यंत पाऊस असाच बरसत राहणार असून त्यानंतर पाऊस कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. तर पालघर, पुणे नाशिक जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यापासून राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे राज्याने जुलैची सरासरी ओलांडली आहे. कोकण, मराठवाड्यातील नांदेड, विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक सातारा कोल्हापूर जिल्ह्यांत अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली. हवामानाच्या सध्याच्या स्थितीमुळे राज्यातील कोकणातील रायगडमध्ये मंगळवार व बुधवारी तसेच ग़डचिरोली, रत्नागिरी व कोल्हापूरमध्ये मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, साताऱ्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.

राज्यात सोमवारी सकाळी साडेआठपर्यंत झालेला पाऊस (मिमी) : इगतपुरी २४०, दावडी २३९, मुलचेरा २०६, ताम्हिणी १९४, शिरगाव १८४, महाबळेश्वर १७४, सावंतवाडी १५१, लोणावळा १४४, कोयना १३३, अहेरी १३०, शाहुवाडी १२९, पेठ १२५, चामोर्शी १२१, धर्माबाद ११६, उल्हासनगर, वर्धा १०८, भोकर, उमरी १०४, वडगाव माव ९७, कर्जत ९०, माथेरान ७७, चिपळूण ७५, संगमेश्वर, देवरुख, महाड ७४, सोयगाव ७१, नाशिक ६२, भिवंडी ५६, ठाणे ५१.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रRainपाऊसDamधरणWaterपाणी