शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

पावसाचे धुमशान : कमी दाबाचा पट्टा आणि अरबी समुद्रातील आर्द्रतेने मुंबईवर संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 3:43 AM

तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. 

पुणे, दि.31 -  तीन दिवसांपासून तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आणि अरबी समुद्रातील आर्द्रता यांमुळे मुंबई व कोकण परिसरात मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होऊन अतिवृष्टी झाल्याचे हवामानशास्त्रज्ञांनी सांगितले. त्यातील काही ढगांची उंची ही ९ किलोमीटरपर्यंत गेली होती़.पुणे हवामान विभागातील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. श्रीवास्तव म्हणाले, ‘‘२७ आॅगस्टला बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. ते २८ आॅगस्टला छत्तीसगडला आले. २९ आॅगस्टला मध्य प्रदेशाच्या पुढे आले. त्याच वेळी अरबी समुद्रातून दुस-यांदा अतितीव्र स्वरूपाची ढगनिर्मिती होत होती़. याचा परिणाम होऊन मुंबई परिसरात मोठ्या प्रमाणावर वृष्टी झाली़ काही ढगांची उंची ही ९ किमीपर्यंत होती़ पण, चक्रीवादळात, गडगडाटासह वादळी पावसाच्या काळात ढगांची उंची १२ ते १४ किमी असते़’’ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जीवनप्रकाश कुलकर्णी म्हणाले, ‘‘मुंबईपासून ५० किमी अंतरावर समुद्रात या ढगांची निर्मिती झाली़ जमिनीपासून साधारण १ कि. मी.वर ढग सुरू होतात. तेथून पुढे त्यांची उंची १२ किमी होती़ काही ढग हे ८ ते ९ किमी उंचीचे होते़ यात सातत्य असल्याने केवळ मुंबईच नाही तर कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस झाला़ सर्वसाधारणपणे ढगांची उंची ही ८ किमीपर्यंत गेल्यानंतर त्यात वीज व गारांची निर्मिती होती. त्यामुळे या ढगांमधून समुद्रात वीज पडण्याच्या अनेक घटना घडल्या असून त्याची नोंद मुंबईतील रडारवर नोंदविली गेली आहे.’’२००५च्या तुलनेत एकतृतीयांश पाऊस...डॉ. कुलकर्णी यांनी २६ जुलै २००५ रोजी झालेल्या पावसाचाही अभ्यास केला होता़ याबाबत त्या वेळी ढगांची निर्मिती मुंबईच्या जवळ झाली होती; त्यामुळे समुद्रात पडणारा पाऊस कमी झाला व तो सर्व मुंबईमध्ये झाला़ २००५मध्ये ढग निर्माण होण्याची प्रक्रिया ही दिवसभर सुरू होती़. त्यामुळे तेव्हा ९४४ मिमी पाऊस झाला होता़ तेव्हाच्या तुलनेत यंदा पडलेला पाऊस हा ३० टक्केच आहे.

टॅग्स :Mumbai Floodedमुंबईत पावसाचा हाहाकार