शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

धरणक्षेत्रांत पावसाची विश्रांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2017 5:51 AM

जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा

पुणे : जिल्ह्यातील सर्वच धरण पाणलोट क्षेत्रांत गुरुवारी (दि. ३१) पावसाने विश्रांती घेतली. मात्र, चार दिवसांपासून झालेल्या दमदार पावसामुळे तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५४.९४ अब्ज घनफूट (१०२.५६ टक्के) झाला होता. त्यामुळे बुधवारी उजनीतून ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.खडकवासला प्रकल्प साखळीतील वरसगाव धरण गुरुवारी शंभर टक्के भरले असून, पाणीसाठा १२.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. पानशेतमध्ये १०.६५ आणि खडकवासला येथे १.९७ टीएमसी (दोन्ही शंभर टक्के) पाणीसाठा झाला असून, टेमघरमध्ये १.९१ टीएमसी (५१.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या चारही धरणांत मिळून २७.३६ टीएमसी (९३.८४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात या प्रकल्पात २८.७९ टीएमसी (९८.४८ टक्के) पाणीसाठा होता.जिल्ह्यातील २४ धरणांपैकी १२ धरणे शंभर टक्के भरली असून, ८ धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात माणिकडोह धरणात ७.५२ टीएमसी (७३.९५ टक्के) आणि पिंपळगाव जोगे धरणात ३.०२ टीएमसी (७७.७५ टक्के) पाणीसाठा आहे. 1 जिल्ह्यातील तब्बल १४ धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने उजनीच्या साठ्यात गेल्या ५ दिवसांत १७ टीएमसीने वाढ झाली. त्यामुळे उजनीतून गुरुवारी ६५ हजार क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले.2उजव्या कालव्यातून ३ हजार आणि बंद वाहिनीतून ९०० क्युसेक्स पाणी सोडण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. उजनी संपूर्ण भरल्याने सोलापूरची पुढील दोन वर्षांची पाणीटंचाई दूर झाल्याचे मानण्यात येत आहे.3कृष्णा खोºयातील कोयना धरणात ९५.४ टीएमसी (९४.९२ टक्के) पाणीसाठा झाला आहे. या धरणाचे पाणलोट क्षेत्र पाहता हे धरणदेखील लवकरच भरेल, अशी चिन्हे आहेत. या खोºयांत धोम धरणात ९.७४ (८३.३१ टक्के) सर्वांत कमी पाणीसाठा असून, इतर धरणे जवळपास भरली आहेत.