शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
2
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
3
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
4
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
5
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप
6
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
7
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
8
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
9
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
10
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
11
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
12
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
13
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
14
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
15
Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...
16
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
17
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
18
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
19
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
20
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी

दैनंदिन वापरासाठी पावसाचे पाणी

By admin | Published: June 01, 2016 12:55 AM

राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे

पुणे : राज्यावर दुष्काळाचे गंभीर सावट असल्याने पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवून त्याचे योग्य प्रकारे नियोजन व्हावे यासाठी ‘लोकमत’चा ‘जलमित्र अभियान’ हा अभिनव उपक्रम राबविला जात आहे. या अभियानाला सकारात्मक प्रतिसाद देत पुण्यातील धायरीमधील साईपूरम सोसायटीने या वर्षी जलपुनर्भरण (रेनवॉटर हार्वेस्टिंग ) प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सोसायटीच्या पाच इमारतींच्या तब्बल ६० हजार चौरसफूट क्षेत्रावर पडणाऱ्या पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी सोसायटीने तब्बल १५० फूट खोलीची एक बोअरवेल घेतली आहे. याशिवाय हे पाणी सोसायटीत अस्तित्वात असलेला एक बोअर आणि सुमारे २० हजार लिटरच्या साठवणूक टाकीत संकलित करण्यात येणार असून, दैनंदिन वापरासाठी या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे. सोसायटीने घेतलेल्या पुढाकारामुळे वर्षाला तब्बल ४२ लाख लिटर पाणी भूगर्भात जिरविणे शक्य होणार आहे. शहरात महापालिकेने २००७ नंतरच्या सर्व इमारतींना रेनवॉटर हार्वेस्टिंगची सक्ती केलेली आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने साईपूरम सोसायटीने यासाठी पुढाकार घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे. या धायरी येथे कैलास जीवन फॅक्टरीजवळ असलेल्या या सोसायटीमध्ये सुमारे ५ इमारती असून, प्रत्येक इमारतीचे छत जवळपास १५ हजार चौरस फुटांचे आहे. त्यामुळे या इमारतींवर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठते. यापूर्वी हे पाणी सोसायटीकडून परिसरात असलेल्या नाल्यात सोडले जात होते. मात्र, राज्यात दुष्काळाचे सावट असल्याने पाणी बचतीसाठी पुढाकार घेण्याचे तसेच प्रत्येक थेंब वाचविण्याचे आवाहन लोकमतकडून करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत साईपूरम सोसायटीने हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्यानुसार, या पाच इमारतींमधील पाणी एका स्वतंत्र यंत्रणेद्वारे संकलित करून ते फिल्टरच्या माध्यमातून पुढे सोसायटीच्या दोन बोअरवेल आणि संकलन टाकीत सोडले जाणार आहे. ४२ लाख लिटर पाण्याची बचत शहरातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता १ हजार चौरसफूट क्षेत्रात जवळपास ७0 हजार लिटर पाणी रेनवॉटर हार्वेस्टिंगद्वारे भूगर्भात पोहोचविता येते. या सोसायटीच्या पाच इमारतींच्या छताचे क्षेत्रफळ हे तब्बल ६0 हजार चौरसफूट आहे. त्यामुळे सोसायटीकडून जवळपास ४२ लाख लिटर पाणी वाचविले जाणार आहे. शहरातील इतर सोसायट्यांसाठी साईपूरम सोसायटीचा हा उपक्रम निश्चितच एक आदर्श ठरणार आहे.