शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चाैकशी करा; वडिलांची मागणी, दुपारी घेतली कारागृहात भेट
2
१६५ लीटरचा फ्रीज, जमिनीवर रक्ताचे डाग, मृतदेहाचे तुकडे; बंगळुरूत पोलीस हादरले
3
युद्ध पेटलं! लेबनानमध्ये ४९२ लोकांचा मृत्यू; हिजबुल्लाहवर इस्त्रायलचा पलटवार
4
बदलापूरनंतर युपीमध्येही गुन्हेगाराचा एन्काऊंटर; ट्रेनमधून कॉन्स्टेबलला फेकणारा गुन्हेगार ठार
5
अग्रलेख : श्रीलंका डाव्या वळणावर! भारताला राहावे लागणार अधिक सावध
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: व्यापार - व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल; धनलाभाची शक्यता
7
घोसाळकर हत्येप्रकरणी सीबीआयकडून गुन्हा; न्यायालयाच्या आदेशानंतर कारवाई
8
सिनेटमध्ये कोण बसणार? युवासेना -अभाविपमध्ये थेट लढत, उत्सुकता शिगेला
9
मुंबई, ठाण्याचा राज ठाकरेंकडून आढावा; संभाव्य उमेदवारांबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा
10
उद्धव ठाकरे, राऊतांना काेर्टाचा दणका
11
‘एसटी’च्या ३९ जमिनी ६० वर्षांच्या लीजवर देणार; ३० वर्षांसाठी प्रतिसाद न मिळाल्याने निर्णय
12
सिडकोची गोड बातमी : दसऱ्याआधी निवडा तुमच्या आवडीचे घर
13
दहशतवाद गंभीर धोका; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन पीएम नरेंद्र मोदींनी दिला इशारा
14
"शाळेचे संचालक अजूनही का सापडलेले नाहीत?", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर आदित्य ठाकरेंचा सवाल
15
"जगन मोहन रेड्डींचे मन शुद्ध असेल तर...", तिरुपती लाडू वादावरून पवण कल्याण यांचा निशाणा
16
Devendra Fadnavis on Badlapur Case Akshay Shinde Encounter: "पोलिसांवर गोळ्या चालवल्या तर..."; देवेंद्र फडणवीसांचे अक्षय शिंदे एन्काऊंटरवर रोखठोक मत
17
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी व्हावी, नातलगांची मागणी 
18
प्रकल्पग्रस्तांनी बांधलेली ‘ती’ घरे होणार नियमित; नवी मुंबई, पनवेल, उरणमध्ये सर्वेक्षण
19
बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदे एन्काऊंटरवर नाना पटोले यांचे सरकारला ३ महत्त्वाचे प्रश्न
20
"प्रकरण दडपण्यासाठी हे एन्काऊंटरचे फेक नॅरेटिव्ह", अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर अनिल देशमुखांचा आरोप

राजगुरुनगरमध्ये भीमेची झाली गटारगंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 4:09 AM

भीमानदीच्या पात्रातील पाणी दूषित झाले आहे. पाणी हिरवे बनत चालले आहे तसेच जलपर्णी पाण्यावर वाढली आहे. कचरा, प्लॅस्टिक यासोबतच ...

भीमानदीच्या पात्रातील पाणी दूषित झाले आहे. पाणी हिरवे बनत चालले आहे तसेच जलपर्णी पाण्यावर वाढली आहे. कचरा, प्लॅस्टिक यासोबतच शहरातील सांडपाणीही नाल्याद्वारे नदीच्या पात्रात मिसळत असल्याने परिसरातील दुर्गंधीत वाढ होत आहे. पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, सिंचनाला पाणी मिळावे या उद्देशाने भीमा नदीच्या पात्रात बंधारे बांधण्यात आले. बंधाऱ्यामुळे नदीचा प्रवाह खंडित झाला आहे. वाहणारे पाणी एका जागी स्थिर झाल्याने प्रदूषणाची वाढ झपाट्याने होत असल्याचे चित्र दिसत आहे.

राजगुरुनगर शहराची लोकसंख्या वाढत आहे. शहरीकरणाचा वेग वाढला, विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधन संपत्तीचा नाश होत आहे नदीचे किनारे नष्ट होऊ लागले, तिचे काठ सिमेंटने बांधले गेले. भीमानदीत सांडपाणी, मैलापाणी सोडले जात आहे. नगर परिषदेने नदीकाठलगतच कचरा डेपो उभारला आहे. यातील काही कचरा नदीपात्रात जात आहे. सांडपाणी, मैलापाणी नदीपात्रात मिसळत असल्याने भीमानदीची गंटारगंगा झाली आहे. यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे ठरु लागले आहे. राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या केदारेश्वर बंधाऱ्याच्या पाण्यावर शेवाळ व दुर्गंधीयुक्त पाणी झाले आहे. जलपर्णीही व वाढू लागल्याने पाणी पिण्यास अयोग्य झाले आहे.

--

फोटो क्रमांक : २७ राजगुरुनगर भीमेची झाली गटारगंगा

फोटो ओळी : भीमानदीपात्रावर जलपर्णी फोफावली असून त्यामुळे नदीपात्रातील पाणी दूषित होत असल्याचे चित्र दिसत आहे.