शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही; सुषमा अंधारे यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 09:28 IST

राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे

पुणे : राजकारणात टीका करणे समजू शकते. मात्र, मागील काही महिन्यांमध्ये पातळी सोडून शिवसेना व ठाकरे परिवारावर टीका केली जात आहे. ज्यांच्यामुळे सगळे वैभव मिळाले त्यांच्याबद्दलच अश्लाघ्य संशय व्यक्त करणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही, असा इशारा शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी दिला. अंधारे यांनी पुण्यात शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. शहरप्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे त्यांच्या समवेत होते. 

अंधारे म्हणाल्या, कदम यांचे आताचे सगळे वैभव शिवसेनेमुळेच आहे हे ते विसरलेले दिसतात. भाजप हिटलर नीतीचा अवलंब करत आहे. किरीट सोमय्या, नवनीत राणा व मोहित कंभोज अशी तीन अमराठी माणसे त्यांनी महाराष्ट्राची बदनामी करण्याकरिता नियुक्त केली आहेत. त्यांच्या मांडीवर जाऊन बसलेल्या मिंधेसेनेचा वापर ते गोबेल्सप्रमाणे अफवा पसरवण्यासाठी करून घेत आहेत. मिंधेसेनेला स्वार्थापोटी ते समजायला तयार नाही.मिंधेसेना बाहेर गेली, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शांतपणे वर्षा बंगला सोडला. त्यांनी कसलाही आक्रस्ताळेपणा केला नाही. आकांडतांडव केले नाही. त्यांच्या अंगी सभ्यपणा आहे. मिंधेसेनेला मात्र सभ्यपणा दाखवायला जमत नाही. ज्या नारायण राणे यांनी रामदास कदम यांना कायम हिणवले, आजही ते त्यांना मान द्यायला तयार नाहीत व तरीही कदम त्यांच्याबरोबर बसतात, उठतात यावरून त्यांची पात्रता काय आहे समजते. आम्ही त्यांना मराठवाड्यात फिरू देणार नाही. शिवसेना त्यांच्याविरोधात उद्यापासूनच आंदोलन सुरू करेल, असा इशारा अंधारे यांनी दिला.

टॅग्स :PoliticsराजकारणRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा