शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले : जुन्नर तालुक्यात ३०० ते ६०० फुटांपर्यंत चाचपणीचा प्रयत्न

By admin | Published: April 26, 2016 1:55 AM

शेतमालातून दोन पैसे मिळावेत म्हणून पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारत आहेत.

खोडद : चालू वर्षीचा भयाण दुष्काळ आणि जमिनींमधील खालावलेली भूजल पातळी यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेतमालातून दोन पैसे मिळावेत म्हणून पाणी मिळवण्याच्या प्रयत्नात मोठ्या प्रमाणात बोअरवेल मारत आहेत. काही वर्षांपूर्वी अवघ्या ५० ते १०० फुटांवर लागणारे पाणी आता ३०० ते ६०० फुटांवरदेखील लागत नसल्याने भविष्यातील पाण्याचा दुष्टीने ही बाब गंभीर झाली असून, विहिरी किंवा बोअरवेलमधील पाणीपातळी वाढविण्यासाठी उपाययोजना करण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.जुन्नर तालुक्यात भूगर्भातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात खालावत आहे. जमिनीतून पाणी मिळेल या आशेने शेतकरी दररोज ५० ते ७० ठिकाणी बोअरवेल खोदत आहेत, पण पाणी मिळण्याऐवजी ३०० ते ६०० फूट खोल बोअरवेलसाठी १८ हजार ते ३० हजार रुपये खर्च होत आहेत. पूर्वी ५० ते १०० फुटांवर असणारी पाणीपातळी आता प्रचंड खालावल्यामुळे विहिरींनी तळ गाठला आहे, त्यामुळे बारमाही विहिरी आठमाही झाल्या आहेत, यामुळे विहीर बागायत कमी होऊन बोअरचे प्रमाण वाढले आहे. यासाठी बिहार,आंध्र प्रदेश, तामिळनाडू या परराज्यांतील हायप्रेशर मशीनद्वारे तीन, चार तासांत बोअरवेल खोदले जातात. उन्हाळी हंगामामध्ये हा व्यवसाय तेजीत आहे. भूगर्भ विभागाच्या सूचनेनुसार २०० फुटांपेक्षा अधिक खोल बोअरसाठी परवानगी घ्यावी लागते पण या सूचनेकडे सर्रास दुर्लक्ष करून खोलवर बोअर घेतले जात आहेत. रोहयो मध्ये जुन्या नव्या बोअरवेल पुनर्भरणासाठी धडक कृती कार्यक्रम हाती घ्यावा लागेल, कारण राज्यात सर्व विभागातील पाणीपातळी ४ ते ७ मीटर घटल्याची नोंद आहे. शास्त्रीय पद्धतीने पावसाचे पाणी पुन्हा जमिनीत सोडणारी यंत्रणा उभी करावी लागेल. यातूनच दुष्काळ या समस्येवर कायमचा शाश्वत उपाय सापडू शकेल, असे कृषी तंत्र निकेतनचे प्राचार्य प्रा. राधाकृष्ण गायकवाड यांनी सांगितले.