शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश; आज केली 'जन सुराज' पक्षाची अधिकृत घोषणा
2
“अमित शाह यांना दररोज नमस्कार केला पाहिजे”; चंद्रकांत पाटील यांनी सांगितले कारण
3
"देशाचे राष्ट्रपिता नाही तर सुपुत्र असतात’’, गांधी जयंती दिवशी कंगना राणौतच्या पोस्टमुळे नवा वाद
4
Harbhajan Singh, IPL 2025 Auction: ना विराट, ना रोहित... 'या' भारतीयावर IPLमध्ये लागेल ३०-३५ कोटींची बोली; भज्जीचा मोठा दावा
5
ठाण्यात चिप्स बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु
6
"तुमच्या हातचा स्वादिष्ट...", नीरज चोप्राच्या आईला PM मोदींचे पत्र; आभार मानताना भावुक
7
"मध्यपूर्वेचा नकाशा बदलण्याची इस्रायलला संधी...", विरोधकांकडून नेतन्याहूंना मिळाला ग्रीन सिग्नल! 
8
Bumrah Ashwin Virat Rohit, ICC test Rankings: जसप्रीत बुमराह 'नंबर १'! कसोटी क्रमवारीत विराट, यशस्वीची मोठी झेप; रोहित, पंत, गिलची घसरण
9
"...मग मनोज जरांगेंनी आधी तिथला उमेदवार जाहीर करावा", लक्ष्मण हाकेंचे चॅलेंज काय?
10
याला म्हणतात परतावा...! TATA च्या या शेअरनं ₹1 लाखाचे केले ₹54 लाख; दमानींकडे तब्बल 4500000 शेअर
11
आता इस्रायल-इराण संघर्ष पेटणार...! समोर आला नेतन्‍याहू यांचा 'रिव्हेंज प्लॅन', जाणून अंगावर शहारा उभा राहील
12
ठाण्यात जेसीबीच्या धक्क्याने महानगर गॅस वाहिनीला गळती, ५०० ग्राहकांचा गॅस पुरवठा खंडीत
13
"मुलगी जर दिसायला चांगली असेल..."; अजितदादा समर्थक आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
14
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह बड्या नेत्यांचा खात्मा करणार, इराणने प्रसिद्ध केली मोस्ट वाँटेडची यादी
15
“आरक्षण वाचवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीला सत्तेत निवडून द्या”; प्रकाश आंबेडकरांचे आवाहन
16
कमी तिथे आम्ही नव्हे, तर भारत म्हणजे 'हमी'! पुतिन यांच्यानंतर अजित डोवाल फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना भेटले; कारण काय?
17
बांगलादेशवर मोठा विजय मिळवत 'कॅप्टन' रोहित शर्माचा विक्रम, विराट कोहलीला टाकलं मागे
18
Irani Cup live : कडक सॅल्युट! सर्फराज खानचे अप्रतिम 'द्विशतक', मुंबईचा 'संकटमोचक' लै भारी लढला
19
लीड रोड करुनही झाली नाही लोकप्रिय; १० मिनिटांच्या 'त्या' भूमिकेने केलं स्टार, आता म्हणते...
20
Palak Sindhwani: गुडबाय! 'तारक मेहता...' मधील सोनूचा मालिकेला रामराम; शेअर केली भावूक पोस्ट

परतीच्या पावसाने भात उत्पादकांना दिलासा

By admin | Published: September 23, 2015 3:36 AM

राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून,

पुणे : राज्यात मुसळधार पावसअभावी रखडलेल्या भातपेरण्या पूर्ण होऊन त्यांची टक्केवारी आता शंभरपर्यंत आली आहे. खरिपाच्या एकूण ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या असून, नीचांकी पेरणीचे संकट सध्याच्या पावसामुळे टळले आहे. राज्यात खरिपाच्या हंगामात १ कोटी ४३ लाख ५६ हजार २०० हेक्टरवर पिके घेतली जातात. आजवर १ कोटी ३२ लाख ९७ हजार २०० हेक्टरवर म्हणजे ९३ टक्के क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. त्यात तृणधान्ये ७७ टक्के, कडधान्ये ८१ व तेलबिया १२१ टक्के असे प्रमाण आहे. कापसाचे ३३ लाख ५६ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असून, कापसाची लागवड ११४ टक्के क्षेत्रावर झाली आहे. उसाची १६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पावसाअभावी भाताच्या आॅगस्टपर्यंत केवळ ४८ टक्के क्षेत्रावर पेरण्या होऊ शकल्या होत्या. पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कडधान्ये व तेलबियांच्या पेरण्या वाढल्या. भातासह ज्वारी, बाजरी, नाचणी, मका यांचा तृणधान्यांत समावेश असून ज्वारी ३९, बाजरी ५६ तर नाचणी ७८ टक्के क्षेत्रावर पेरण्यात आली आहे. मका १२८ टक्के, अन्य तृणधान्ये ७९ टक्के असे पेरण्यांचे ताजे चित्र आहे. खरीप तेलबियांचे ३३ लाख ९ हजार ९०० हेक्टर क्षेत्र आहे. तेलबियांपैकी भुईमुगाची पेरणी ६४ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. तीळ ३१ टक्के, कारळ ३५ टक्के, सूर्यफू ल १३ टक्के असे प्रमाण असून, शेतकऱ्यांना अधिक भाव मिळवून देणाऱ्या सोयाबीनची तब्बल १३५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली. २७ लाख ९९ हजार ४०० हेक्टर क्षेत्र असताना ३७ लाख ७३ हजार ९०० वर पेरणी झाली आहे. खरीप तेलबियांचे एकूण पेरणी क्षेत्र त्यामुळे १२१ टक्क्यांपर्यंत गेले आहे. पावसाने दोनदा मारलेल्या दडीमुळे यंदा खरिपाचे उत्पादन कमी येण्याची भीती व्यक्त होत आहे.(प्रतिनिधी)