शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

भात पिकाला दिलासा! माळशेजच्या आदिवासी पट्ट्यात पावसाचे आगमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 3:55 PM

भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत....

उदापूर (पुणे) : जुन्नर तालुक्यासह माळशेज पट्ट्यातील आदिवासी भागात गेल्या अनेक दिवसांपासून वरुण राजाने हुलकावणी दिली होती. आदिवासी भागातील भात लागवड केलेली खचरे रिकामी होत चालली होती. त्यामुळे आदिवासी भागातील संपूर्ण वर्षाचे अर्थकारण सांभाळणारे मुख्य पीक धोक्यात आले होते. बळीराजा आपली पिके वाचवण्यासाठी पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. अखेर गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याची प्रतीक्षा संपली आणि पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली. त्यामुळे भात पिकासह इतर रब्बी पिकांना दिलासा मिळणार असल्यामुळे आदिवासी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले असून, शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत.

माळशेज पट्ट्यात पंधरा ते वीस दिवसांपासून उन्हाचा तीव्र चटका वाढत असल्यामुळे शेतातील रब्बी हंगामातील सोयाबीन, भुईमूग, तूर, उडीद, भात आदी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.

काही शेतकऱ्यांनी पिकांना स्प्रिंकलर करून पिके वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु तोही फेल ठरला. त्यामुळे पावसावाचून पर्याय नव्हता. हातातोंडाशी आलेली पिके पुन्हा एकदा वाया जाणार आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडणार अशी शक्यता निर्माण झाली होती.

गुरुवारी गोपाल काल्याच्या दिवशी सकाळीच पावसाने सुरुवात केली आणि शेतकऱ्यांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर बालचमूंचा गोपाल काला गोड झाला.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड