शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

नदीकाठच्या रहिवाशांना धोका

By admin | Published: July 16, 2017 3:49 AM

दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : दरवर्षी पावसाळा सुरू होताच, महापालिकेतर्फे नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जात असे़ आपत्कालीन परिस्थितीत तातडीची मदत उपलब्ध करून देता यावी, यासाठी पूरनियंत्रण कक्ष सुरू केला जात असे. अलीकडच्या काळात महापालिकेला याचा विसर पडला असून नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास महापालिका प्रशासनाला ऐनवळी धावपळ करावी लागणार आहे.नेमेचि येतो पावसाळा या उक्तीप्रमाणे महापालिका दरवर्षी पावसाळा सुरू होताच, पूरनियंत्रण कक्ष स्थापून त्यांच्यावर आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज होण्याची जबाबदारी सोपवली जात असे. नागरिकांसाठी हेल्पलाईन सुरू केली जात असे. आता मात्र महापालिका प्रशासनाला याचे गांभीर्य राहिलेले नाही. पिंपरीत नदी काठी संजय गांधीनगर वसाहत आहे. नदीपात्रालगत झोपड्या आहेत. तसेच रहाटणी, दापोडी, सांगवी परिसरात नदीकाठी घरे आहेत. पावसाचा जोर वाढल्यानंतर नदीपात्र दुथडी भरून वाहते. बांधकाम व्यावासायिकांनी नदीकाठी भराव टाकल्याने पात्र उथळ झाले आहे. मध्यंतरीच्या काळात पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी बंधारे फोडण्याचा प्रयोग महापालिकेने केला. मात्र त्यानंतर नदीपात्रालगत राडारोडा टाकणे सुरूच राहिले आहे. महापालिकेचे आपत्कालीन स्थितीशी सामना करण्याचे नियोजन होणे अपेक्षित आहे. असे नियोजन आणि कृती आराखडा दरवर्षी केला जात होता. त्यानुसार यंत्रणा मात्र कार्यन्वीत होत नव्हती, निदान नियोजन तरी केले जात होते. त्यामुळे महापालिकेने नदीकाठच्या रहिवाशांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत दक्षता घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पवना धरण क्षेत्रातील पावसाचे प्रमाण, धरणाच्या पाणी पातळीची स्थिती याची आकडेवारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे रोजचे रोज अपडेट होत असे. त्यानुसार धरणाच्या पाणी पातळीत वाढ होताच, महापालिका प्रशासन नदीकाठच्या रहिवाशांना सतर्कतेच्या सूचना देत असे. सद्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संपर्क यंत्रणा कोलमडली आहे. जनजागृतीत कमी पडल्याची अधिकाऱ्याची कबुलीमहापालिकेने आपत्कालीन व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून नियोजन केले आहे. कृती आराखडा तयार आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांवर कामाची जबाबदारी निश्चित केली आहे. स्वयंसेवी संस्थांच्या कार्यकर्त्यांना सूचना दिल्या आहेत. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. असा दावा महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाशी संबंधित अधिकाऱ्यांनी केला आहे. महापालिकेची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांना तातडीक मदत कोणाकडून कशी मिळविता येईल, याची माहिती क्षेत्रिय कार्यालये, मुख्य प्रशासकीय इमारत येथे लावण्यात आलेली आहे. हेल्पलाइन क़्रमांक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात कमी पडल्याची कबुली आपत्कालीन कक्ष अधिकारी अनिल कदम यांनी दिली.