शहरं
Join us  
Trending Stories
1
मच्छिमार महामंडळासाठी ५० कोटी मंजूर, राज्य सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय, वाचा...
2
"माझ्या करिअरचं फार वाटोळ केलं", पंकजा मुंडेंनी हात जोडून हसतच दिलं उत्तर
3
महायुती सरकारच्या काळात विधिमंडळ समित्याच नाहीत, 'मविआ'ने नेमल्या पण...; अहवालातून माहिती उघड
4
राजकीय पक्षांच्या मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या मेळाव्यात या: मनोज जरांगे
5
INDW vs NZW : सलामीच्या सामन्यापूर्वी Team India ला सरप्राईज; स्मृती मानधनाच्या डोळ्यात पाणी
6
"हे खूपच गंभीर आणि लज्जास्पद", अमित शाह ड्रग्ज प्रकरणावरून काँग्रेसवर का भडकले?
7
काश्मिरात मोठा खेला? रिझल्टपूर्वीच NC-BJP सोबत येण्याची चर्चा; फारूक अब्दुल्ला कुणाला भेटले?
8
Ashish Shelar : "मुंबईच्या पाणी तुटवड्याला आदित्य ठाकरे जबाबदार"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
“जरांगेंच्या प्रकृतीची काळजी, आमचे सरकार आल्यास ५० टक्क्यांवर आरक्षण देऊ”: संजय राऊत
10
"जोरात झटका लागला, व्हिडिओ काढले...", गोळी कशी लागली?; गोविंदाने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
11
टाटांनी 'या' कंपनीतून कमावला २३,०००% नफा; आता कमी केला हिस्सा, कोणती आहे कंपनी?
12
गजबच झालं! ठगांनी थेट खोटी बँकच सुरू केली, लाखो रुपये घेऊन लोकांना नोकरीही दिली, मग...
13
आदिवासी आमदारांचा आक्रमक पवित्रा; मंत्रालयातील संरक्षण जाळीवर उतरून आंदोलन, नेमकं काय घडलं?
14
VINTAGE भज्जी! हरभजनने लगावला अफलातून सिक्सर; जाग्या झाल्या जुन्या आठवणी
15
टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान
16
"लोकांनी सिनेमा बघायला यावं म्हणून गौतमी पाटीलला...", अमेय वाघचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिच्या शोला..."
17
तिरुपती लाडू वाद: “कोट्यवधी भाविकांच्या आस्थेचा विषय, स्वतंत्र SIT तपास करणार”; SCचे निर्देश
18
“राज्यात बहि‍णींना सुरक्षेची गरज, वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार”: नाना पटोले
19
Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवे दर?
20
न्यूक्लिअर अ‍ॅटॅक करू...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान किम जोंगने कुणाला दिली धमकी? 10000KM दूरपर्यंत धाक-धूक वाढली!

वाळकी नदीवरील पूल धोकादायक

By admin | Published: May 12, 2017 4:49 AM

कोळवण खोऱ्यातील करमोळी ते चाले दरम्यानच्या वाळकी नदीवरील पुलाचे कठडे ढासळल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभूगाव : कोळवण खोऱ्यातील करमोळी ते चाले दरम्यानच्या वाळकी नदीवरील पुलाचे कठडे ढासळल्यामुळे हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलावर झाडे वाढलेली आहेत, त्यामुळे पुलाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कोळवण भागातील अनेक नागरिक व शेतकरी या पुलाचा दळणवळणासाठी वापर करतात. या रस्त्यावरून पुढे हडशीला सत्यसाईबाबा मंदिर, पवना धरण, तुंग-तिकोणा, लोहगड-विसापूर हे किल्ले, लोणावळा ही पर्यटनस्थळे आहेत. सध्या शाळेला सुट्या असल्याने या रस्त्यावर पुण्यातून अनेक पर्यटक जातात. तसेच मुळशीतील अनेक लोक मुंबई, कामशेत, पवनानगर या ठिकाणी जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करतात. पूल अरुंद असल्यामुळे रात्रीच्या वेळी या पुलावरून प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. तसेच या पुलावर लहान- मोठ्या अपघातांच्या घटना घडत असून, या पुलाच्या कठड्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागच्या आठवड्यात वाळकी नदीवरीलच कोळवण ते हडशी दरम्यानच्या ब्रिटिशकालीन पुलाचा मुख्य आधार असलेला खांब पडला होता. त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाला होता. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे पाठपुरवठा केला तेव्हा या पुलाचे काम सुरु केले. तसेच मुळा नदीवरील घोटावडे येथील पूलही जीर्ण झाल्यामुळे सुमारे दहा वर्षांपूर्वी पडला होता. यावेळी पुलावरून जात असताना दाम्पत्य जखमी झाले होते. त्यानंतर या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात आला. अशा धोकादायक झालेल्या पुलांवर अपघात घडून काही नागरिकांचा मृत्यू झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून होत आहे.