शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात आचारसंहिता?; निवडणूक कार्यक्रम घोषित होण्याची शक्यता
2
"भोले बाबांना सरकारचं संरक्षण"; आरोपपत्रात नाव नसल्याने मायावती संतापल्या, म्हणाल्या...
3
Gold Silver Price 3 October: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; पाहा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे दर
4
भारतामुळे आज इस्त्रायलकडे आहे 'हे' मोठे शहर; ज्यानं अर्थव्यवस्थेला मिळते चालना
5
Yusuf Pathan, LLC Video: दे घुमा के!! युसुफ पठाणने लगावले एकाच ओव्हरमध्ये ३ षटकार, चेंडू थेट मैदानाबाहेर!
6
मुख्यमंत्रि‍पदाच्या उमेदवारीवर मनोज जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, "प्रत्येकाची भावना..."
7
Oral cancer चे निदान टूथब्रशद्वारे लागणार, IIT Kanpur मध्ये बनवलेले डिव्हाईस लवकरच बाजारात येणार!
8
नवरात्र: इच्छा असूनही दुर्गा सप्तशती म्हणणे शक्य नाही? ‘असे’ पठण करा; संपूर्ण पुण्य मिळवा
9
आता लाडक्या बहिणींच्या खात्यात केव्हा जमा होणार ऑक्टोबर-नोव्हेंबरचे पैसे? फडणवीस म्हणाले- काळजी करू नका, परत...
10
नवरात्र: ५ मिनिटांत होणारे ‘हे’ स्तोत्र म्हणा; संपूर्ण दुर्गा सप्तशती पठणाचे पुण्य मिळवा
11
Mumbai Metro 3 Ticket Rates: मेट्रो-३ चे तिकीटाचे दर काय? कुठून कुठवर सेवा? कसा होणार फायदा? जाणून घ्या सारंकाही...
12
"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान
13
Bigg Boss Marathi 5 : रितेश देशमुखचे 'भाऊच्या धक्क्या'वर कमबॅक, ग्रँड फिनाले रंगणार ६ ऑक्टोबरला
14
Navratri Special: नीना कुळकर्णींची लेक सोहादेखील आहे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत, अभिनयात नाही पण...
15
"संजय अंकल अश्लील कृत्य करतात"; पुण्यात व्हॅन चालकाचा चिमुकल्यांसोबत घृणास्पद प्रकार
16
सद्गुरूंच्या ईशा फाऊंडेशनला मोठा दिलासा, उच्च न्यायालयाच्या आदेशाला SC ची स्थगिती; नेमकं प्रकरण काय?
17
नवरात्र: अखंड दिवा अत्यंत शुभ, ‘या’ दिशेला लावा, अकाल मृत्यू टाळा; वाचा, अखंड ज्योत महत्त्व
18
सावधान! जास्त टोमॅटो खाल्ल्याने वाढते सांधेदुखी, चालणं होतं अवघड; 'या' समस्यांचा धोका
19
मारुतीची गाडी घेतली असेल तर सतर्क रहा; हा सोन्याएवढा मौल्यवान पार्ट चोरांच्या रडारवर
20
Navratri 2024: प्रतापगडावर दोन घट बसविण्याची परंपरा असलेले राज्यातील एकमेव मंदिर!

‘लॉकडाऊन’मुळे ‘रोजी’ गेली;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2021 4:10 AM

जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले ...

जिह्यात सुमारे ११ हजार २८३ जणांना मिळतोय लाभ

पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे हातावर पोट असलेल्या कामगार वर्गांचे हाल होत आहेत. मात्र, सरकारने २ लाख शिवभोजन थाळी मोफत देण्याची व्यवस्था केल्याने कामगारांना दिलासा मिळाला आहे. जेवणाचा मुख्य प्रश्न भागल्याने कामगारांनी समाधान व्यक्त केले. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात थाळीचा लाभ घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.

कडक निर्बंधामुळे हातावर पोट असलेल्या गरिबांची उपासमार होऊ नये, म्हणून एक महिनाभर रोज जवळपास २ लाख थाळ्या मोफत दिले जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानुसार कामगारांना थाळीचा लाभ मिळत आहे.

बुधवारी १४ एप्रिल रोजी रात्री आठ वाजेपासून ते १ मेपर्यंत राज्यात संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गरिबांच्या रोजीरोटीची प्रश्न निर्माण झाली असती. कोरोनाला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन केल्याने अनेकांची रोजी बंद पडली आहे. त्यामुळे मोफत शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय घेतला.

------------------------

जिह्यात शिवभोजन थाळी केंद्र-

एकूण ९७ (शहरात २६, ग्रामीण भागात ७१)

दररोज घेतात लाभ -

एकूण ११, २८३ (शहरात ४,१२९, ग्रामीण भागात ७,१५४)

.........

थाळीचा लाभ घेणारे

मागच्या लॉकडाऊनपासून शिवभोजन थाळीचा लाभ घेत आहे. थाळीमुळे जेवणाची चिंता मिटली आहे. काम नसल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची आहे. सरकारने राबविलेली योजना चांगली आहे.

- दुर्गाराम भाटी

-----------------------

शहरात शिकण्यासाठी आलो आहे. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद आहे. मूळ गावी न जाता डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो आहे. पोटभर शिवभोजन थाळीमुळे चांगले जेवण मिळते. सध्या काम सुरू असले तरी तेवढ्या प्रमाणात रोजगार मिळत नाही.

-नीलकंठ वाघ

-----------------

काम नसल्यामुळे आर्थिक अडचण सुरू आहे. लॉकडाऊनमुळे काम मिळणे कठीण होऊन बसले आहे. पहिल्या लॉकडाऊनमध्ये खूप त्रास सहन करावा लागला होता. आताही परिस्थिती तशीच होऊ लागली आहे. शिवभोजन थाळी मोफत मिळत असल्याने आधार मिळाला आहे.

-कोमल पट्टीवार

...........

११३ जणांना मिळतो

दररोज लाभ....

१) प्रत्येक केंद्राला थाळीची मर्यादा दिलेली आहे. आमच्या केंद्राला ७५ थाळीची मर्यादा होती. सद्य परिस्थितीत ११३ थाळींची मर्यादा वाढवून देण्यात आली आहे.

२) काही केंद्रांना २१३ ते २३५ पर्यंत थाळ्यांची मर्यादा देण्यात आली आहे. शिवभोजन थाळीमुळे अनेकांचा जेवणाचा गंभीर प्रश्न सुटला आहे. दिवसेंदिवस थाळीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. असे थाळी केंद्रचालक रोहित पाठारे यांनी सांगितले.

-----------------