शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

रोहिंग्यांना शोधून बांगलादेशात परत पाठवणार -किरीट सोमय्या सोमय्यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 08:47 IST

उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय नागरिकांना जेलमध्ये टाकण्यात येत होते.

पुणे : शहरात म्यानमारमधील रोहिंग्यांना जन्माचे दाखले देण्यासंदर्भात जागृती दिसत आहे. गेल्या वर्षात जिल्ह्यात केवळ ६० जणांना जन्माचे दाखले दिले होते, पण मालेगाव शहरात ४ हजार ३१८ जणांना दाखले देण्यात आले आहेत. अमरावतीत ४ हजार ५३७, मुंबईत ५८ दाखले देण्यात आले आहेत. राज्यातील अनेक शहरांत बांगलादेशी व रोहिंगे यांना दाखले देण्यात आले आहेत. अशा सगळ्यांना शोधून बांगलादेशात परत पाठविण्यात येणार आहे, असा दावा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.

सोमय्या यांनी गुरुवारी (दि. १६) जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून जन्म-मृत्यू दाखल्यांची माहिती घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत विचारले असता ते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार मजबूत आहे. मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याने बोलण्याची संधी मिळत आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यात तर राजकीय नागरिकांना जेलमध्ये टाकण्यात येत होते. राज्याची कायदा आणि व्यवस्था एकदम मजबूत असून छोटीशी घटना घडली की लगेच लक्षात आणली जात आहे. त्याचा पाठपुरावा केला जात आहे. सलमान खान यांचा एक विषय वेगळा असून, वर्षानुवर्षे तो चाललेला आहे.

वाल्मीक कराडवर ईडीची कारवाई झाली नाही याकडे लक्ष वेधल्यानंतर साेमय्या म्हणाले, वाल्मिकीविषयीचे गुन्हे तसेच विषय समोर येतील तेव्हा स्वतःहून ईडी दखल घेत असते. सध्या तपास सुरू आहे. ईडी ही त्यांच्या कार्यपद्धतीनुसार तपास करत असते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडKirit Somaiyaकिरीट सोमय्याRohingyaरोहिंग्या