शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
7
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
8
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
9
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
10
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
11
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
12
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
13
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
14
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
15
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
17
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
18
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
19
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
20
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी

आरआरसीची कारवाई अर्धवट : स्वाभिमानी शेतकरी संघटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 19:47 IST

सर्व थकीत एफआरपीची रक्कम न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शनिवारी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला. 

ठळक मुद्देएफआरपी रक्कम तातडीने देण्याची साखर आयुक्तांकडे मागणीसाखर आयुक्तालयाने केवळ १६० कोटी ८६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) केले जारीस्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा देत शनिवारी साखर आयुक्तांना निवेदन

पुणे : उसाच्या रास्त आणि किफायतशीर (एफआरपी) दरापोटी राज्यातील कारखान्यांकडे तब्बल २२० कोटी रुपयांची थकबाकी असून, साखर आयुक्तालयाने केवळ १६० कोटी ८६ लाख रुपयांच्या वसुलीसाठी रेव्हेन्यू अ‍ॅण्ड रिकव्हरी सर्टिफिकेट (आरआरसी) जारी केले आहे. सर्व थकीत एफआरपीची रक्कम न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा शनिवारी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे देण्यात आला. एफआरपीची थकीत रक्कम मिळावी यासाठी बीड आणि सातारा येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने साखर आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. स्वाभिमानीचे प्रवक्ते योगेश पांडे, बीडचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामूलकर, प्रभाकर गाडे, बीड जिल्हाध्यक्ष राजू गायके, युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, गणेश जंगले यांचा शिष्टमंडळात समावेश होता.न्यू फलटण येथील कारखान्याने शेतकऱ्यांचे ४७ कोटी ८६ लाख ९८ हजार रुपये थकविले आहेत. साखर आयुक्तालयाने २६ एप्रिल २०१८ रोजी आरआरसीची कारवाई करुनही जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केलेली नाही. बीडमधील जय महेश एनएसएल कारखान्याने ३८ कोटी ९२ लाख ४४ हजार आणि जय भवानी कारखान्याने ७ कोटी ३६ लाख ६९ हजार रुपये थकविले आहेत. या कारखान्यांवरही अनुक्रमे २३ आणि २६ एप्रिल रोजी आरआरसीची कारवाई करण्यात आली. सबंधितांवर कारवाई करायची सोडून या कारवाईला सहकारमंत्र्यांनी स्थगिती दिली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शुगर केन कंट्रोल अक्ट नुसार उसाचे गाळप झाल्यापासून १४ दिवसांत उसाची रक्कम उत्पादकांना दिली पाहीजे. आता अगामी हंगाम सुरु होत आहे. तरीही उत्पादकांना एफआरपीची रक्कम दिलेली नाही. व्याजासह थकीत रक्कम न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणतीही पूर्व सूचना न देता कठोर पावले उचलेल असे निवेदनात म्हटले आहे. स्वाभिमानीचे प्रवक्ते पांडे म्हणाले, राज्यातील कारखान्यांकडे २२० कोटी रुपयांची थकबाकी आहे. असे असताना केवळ १६० कोटी रुपयांच्या थकबाकीपोटी आरआरसी कारवाई करण्यात आली आहे. सत्ताधाऱ्यांशी संबंधित कारखान्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेState Governmentराज्य सरकार