शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
3
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
5
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
6
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
7
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
8
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
9
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
10
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
11
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
12
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
13
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
14
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
15
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
16
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
17
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
18
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
19
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
20
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...

Pune Flood: पुण्यातील पूरग्रस्तांना २-३ दिवसांत २५ हजार रुपयांची मदत; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 12:17 IST

कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही, सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार

पुणे : पूरग्रस्तांना पैसे देण्यासाठी राज्य सरकारकडे मागणी केली असून, दोन-तीन दिवसांत मदतीचे वाटप सुरू होईल. ज्यांचे पंचनामे झाले नाहीत, त्यांचे पंचनामे नव्याने करून त्यावर कार्यवाही केली जाईल. कोणाही पूरग्रस्ताला वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सध्या अन्नधान्य किट वाटप सुरू असून, त्यामध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे. पूरग्रस्तांना २५ हजार रुपयांची मदत देण्यासाठी सकारात्मक विचार सुरू असून, लवकरच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी पूरग्रस्तांना दिले.

नुकत्याच झालेल्या संततधार पावसामुळे शहरातील काही भागांना पुराचा मोठा फटका बसला. या पूरग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आटवले गट)च्या वतीने पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हजारोंच्या संख्येने निघालेला हा आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, सिंचन भवन आणि पुणे महापालिका असा धडकला.

यावेळी शेकडो पूरग्रस्त नागरिक सहभागी झाले. रिपाइंचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, सुनीता वाडेकर, प्रदेश संघटक परशुराम वाडेकर, ॲड. मंदार जोशी, माजी नगरसेवक अशोक कांबळे, महेंद्र कांबळे उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, नदी सुधार प्रकल्पाचा पुनर्विचार करू. तसेच नव्याने ब्लू लाइन व रेड लाइन निश्चित करणार आहोत. नाले आणि नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू केलेली असून, लवकरच पाणी जाण्याचे मार्ग खुले होतील. कॅनॉलमधून पाणी ओसंडणे थांबविण्यासाठी फुरसुंगीपर्यंत जमिनीखालून पाइपलाइन टाकण्याचे काम लवकरच होईल.

संजय सोनवणे म्हणाले, शहरातील जवळपास दहा हजार कुटुंबे पुरामुळे बाधित झाली आहेत. राज्य सरकारकडून त्यांना अद्याप कोणतीही मदत मिळालेली नाही. येत्या काळातही नदीकाठच्या वस्त्यांवर पुराची टांगती तलवार असणार आहे. त्यामुळे पुन्हा पूरस्थिती उद्भवू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करावेत.

ठळक मागण्या 

- प्रत्येक कुटुंबास २५ हजार रुपयांची तातडीची मदत करावी.- पूरस्थितीला कारणीभूत ठरणारी अतिक्रमणे तत्काळ काढावीत

- पूररेषा (रेडलाइन, ब्लू लाइन) नव्याने आखण्यात यावी.- आपत्कालीन व्यवस्थापन समिती सक्षम करावी

- पाण्याचा विसर्ग करण्याला पर्यायी मार्ग तयार करावा.

टॅग्स :PuneपुणेfloodपूरWaterपाणीFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनMONEYपैसाcollectorजिल्हाधिकारी