शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

माऊलींचा रथ बाेलणार, पुष्पसजावटीतून संतांचे जीवन सांगणार! रथावर १५ प्रसंगांना स्थान देणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2024 14:05 IST

प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात आला असून तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार

पुणे: माउलींच्या दर्शनासाठी भाविक आसुसलेले असतातच; पण त्यांच्या रथाची सजावटही तितकीच लोभस आणि नयनरम्य असते. आळंदीतील गरुड कुटुंबीय गेली ४० वर्षे हा रथ आकर्षक फुलांनी सजवीत आहेत. गेली दोन वर्षे माउलींच्या वेगवेगळ्या नावे फुलांनी साकारण्यात आली होती. आता यंदा या रथावर संतांचे जीवनप्रसंग रेखाटण्यात आले आहे. यात १५ जीवन प्रसंगांचा समावेश आहे.

माउलींच्या रथाला सजविण्याचे काम ४० वर्षांपूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष नानासाहेब गरुड यांनी सुरू केले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी हे काम अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. माउलींच्या दर्शनाला होणारी गर्दी रथाचे मनमोहक रूप पाहून थक्क होतात. प्रदीप गरुड हे रथासाठी मार्केटयार्डातून फुले आणतात. प्रत्येकवेळी रथ सजविण्यासाठी सुमारे २५ ते ३० हजारांची फुले लागतात. त्यात जर्बेरा, ॲन्थुरियम, लिली, झेंडू, मोगरा कार्नेशन या फुलांचा वापर केला जातो. १२ ठिकाणच्या मुक्कामांसह एकूण १५ वेळा रथ सजविला जातो.

प्रस्थानावेळी महाद्वाराच्या सजावटीसह पादुकांना हार घालून रथाच्या सजावटीचे काम सुरू होते. त्यासाठी अनेक हात राबतात. त्यात अक्षय भोसले, कैलास आवटे, दशरथ गोडसे यांच्यासह अनेक जण सहभागी होतात. दरवर्षी फुलांची सजावट वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न असल्याचे गरुड सांगतात. गेली दोन वर्षे माउलींच्या विविध नावांना फुलांतून साकारण्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, यंदा काहीतरी वेगळे करावे, असे त्यांच्या मनात घोळत होते. त्यातूनच यंदा संताचे जीवनप्रसंग रथावर साकारण्याचे त्यांनी ठरविले. मात्र, हे शिवधनुष्य पेलता येईल का, असा विचार त्यांच्या मनात येऊन गेला. हा विचार त्यांनी मित्रांजवळ बोलूनही दाखवला. त्यांनी दिलेल्या पाठबळातून हे जीवनप्रसंग फुलांमधून उमटविण्याचे ठरविले.

माउलींची पालखी १२ ठिकाणी मुक्कामी राहिल्यानंतर त्यावर सजावट करण्याची संधी मिळते. त्यासाठी ते सर्व फुले पुण्यातील मार्केट यार्डातून आणतात. या १२ ठिकाणांसह आणखी ३ वेळा रथ सजविला जातो. अशा १५ वेळा रथावर आता माऊलींचा जीवनप्रसंग साकारण्यात येणार आहेत. त्यात प्रस्थानावेळी माउली ज्ञानेश्वरी लिहित असतानाचा प्रसंग रेखाटण्यात येणार आहे. तर निर्जीव भिंत चालविताना, रेड्यामुखी वेद बोलविणे अशा एकूण १५ प्रसंगांना रथावर स्थान देण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना हे जीवनप्रसंग पुन्हा फुलांमधून अनुभवता येणार आहे.

माउलींच्या रथावर यंदा संतांचे जीवनप्रसंग साकारण्यात येणार आहे. यंदा रथ सजविण्याचे ४० वे वर्षे आहे. माउलींची सेवा करतोय, त्याला भाविकांची साथ मिळतेय. - प्रदीप गरुड, आळंदी

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022sant dnyaneshwar palkhiसंत ज्ञानेश्वर पालखीSocialसामाजिकAlandiआळंदी