शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
3
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
4
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
5
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
6
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
7
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
8
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
9
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
10
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
11
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
12
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
13
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
14
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
15
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
16
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
17
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
18
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
19
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
20
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?

Ashadhi Wari: उरळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ; वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 20:32 IST

आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, उरुळी कांचनच्या सरपंचांनी मागितली माफी

उरुळी कांचन:  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यामध्ये उरुळी कांचन येथील पालखी विसावा यात बदल  विश्वस्तांनी केला होता. या विश्वस्तांच्या बदला संदर्भात उरुळी कांचन ग्रामस्थ पुढारी यांची मागील काही दिवसांपूर्वी राम मंदिरात बैठक होऊन जर पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गावबंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये विश्वस्तांनी वर्षानुवर्ष आश्रम रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे पालखी जाते . तो मार्ग विश्वस्तानी रद्द केला होता.  त्याचा विरोध ग्रामस्थ व नेतेमंडळी करीत होती.         बुधवारी (दि०३) रोजी पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन एलाईट चौकामध्ये आली असता ग्रामस्थांनी पालखी पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली. मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ अडवून धरला. वाढत्या नागरीकरणाचे व रस्त्याचे कारण विश्वस्तांनी दिले होते. सालाबादप्रमाणे उरळीकांचन शहरांमधून पालखी जावी व पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला.        ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादविवादानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला व नगाऱ्याला बैल जुंपण्यास सांगितले. ग्रामस्थांनी यावेळेस माणिक मोरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली. वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही.     पालखी विसावा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता यासाठी दर्शन मंडप सुद्धा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावर पालखी विसावा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आम्ही लोक महामार्गावर गर्दी न करता महाविद्यालयाच्या मैदानावर गेलो होतो. परंतु पालखी विसाव्यासाठी न आल्याने आम्हाला दर्शन घेता आले नाही. यावर्षी आमचे पालखीचे दर्शन झाले नाही असे पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी सांगितले. 

...तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो    रात्री कदमवाक वस्ती येथे विश्वस्तांबरोबर चर्चा करून  सालाबाद प्रमाणे पालखी मार्ग ठेवावा यासाठी विनंती केली होती. परंतु बाकी विश्वतांपेक्षा माणिक मोरे यांनी विरोध केला व पंचक्रोशीतील भाविकांचे मन दुखावले आहे. एकट्याच्या या आडमुठेपणा धोरणामुळे वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली आहे. आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. - उरुळी कांचन सरपंच अमित कांचन.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाuruli kanchanउरुळी कांचनPandharpurपंढरपूरsarpanchसरपंच