शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेचं 'मिशन महाराष्ट्र'! राज ठाकरे आज मराठवाड्यात; त्यानंतर नाशिक, पुणे दौरा करणार
2
राष्ट्रवादी प्रवेशाची घोषणा करताच हर्षवर्धन पाटलांचा जुना व्हिडिओ व्हायरल, काय म्हटलंय?
3
अहमदनगर शहराचे नाव 'अहिल्यानगर'; जिल्ह्याचे नाव राहणार तेच; सरकारी आदेश जारी
4
Virat सह अनेक सेलिब्रिटींचे डीपफेक व्हिडीओ बनवून होतेय फसवणूक; बनावट गेमिंग अ‍ॅपद्वारे कोट्यवधींची लूट
5
संतापजनक! "पप्पा वाचवा..." ओरडत पळाल्या मुली; शाळेतून परतताना तरुणांनी काढली छेड
6
'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख
7
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
8
IND vs NZ सामन्यात 'चिटिंग'? आर. अश्विननंही केली 'चॅटिंग', पण...
9
अमेठीत घडलं 'बदलापूर', आरोपी गंभीर जखमी! पोलिसाची रिव्हॉल्वर हिसकावताना घडली घटना
10
संपादकीय: अभिजात मराठी!
11
"दिवट्या आमदार..."; सुनील टिंगरेंवर शरद पवारांची टीका; अजितदादा म्हणाले, "बदनामीचा प्रयत्न..."
12
"शस्त्र सोडून गांधीवादी विचारानं काम करतोय..."; फुटिरतावादी यासीन मलिकचा कोर्टात दावा
13
शेवटच्या दिवशी अरबाजची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री; धावत येऊन निक्कीला उचललं, बेडरुममध्ये घेऊन गेला अन्...; सदस्यही पाहतच राहिले
14
Pan Cardबद्दल तुम्हाला किती माहितीये? पॅन क्रमांकाचा अर्थ काय? एकात असतं तुमचं आडनाव
15
"खाऊन पिऊन बिल उधार ठेवून आले"; दावोस दौऱ्यात CM शिंदेंची १.५८ कोटींची थकबाकी, कंपनीची नोटीस
16
Taro Card: देवीची कृपा मिळवून देणारा चैतन्यमयी आठवडा; वाचा तुमचे साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
अजित पवारांच्या भायखळा NCP तालुकाध्यक्षाची हत्या; मुंबईत रात्री घडला थरार 
18
दररोज घसतोय Ola Electricचा शेअर; ₹१०० च्या खाली आला भाव; काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
19
‘त्या’ ९ मंत्र्यांना पक्षात पुन्हा प्रवेश मिळणार नाही; शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय : देशमुख
20
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला

Ashadhi Wari: उरळी कांचनमध्ये तुकोबांच्या पालखी सोहळ्यात गोंधळ; वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 8:30 PM

आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, उरुळी कांचनच्या सरपंचांनी मागितली माफी

उरुळी कांचन:  जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यामध्ये उरुळी कांचन येथील पालखी विसावा यात बदल  विश्वस्तांनी केला होता. या विश्वस्तांच्या बदला संदर्भात उरुळी कांचन ग्रामस्थ पुढारी यांची मागील काही दिवसांपूर्वी राम मंदिरात बैठक होऊन जर पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गावबंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये विश्वस्तांनी वर्षानुवर्ष आश्रम रस्त्याने भैरवनाथ मंदिराकडे पालखी जाते . तो मार्ग विश्वस्तानी रद्द केला होता.  त्याचा विरोध ग्रामस्थ व नेतेमंडळी करीत होती.         बुधवारी (दि०३) रोजी पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन एलाईट चौकामध्ये आली असता ग्रामस्थांनी पालखी पारंपारिक रिवाजाने गावाला प्रदक्षिणा घालून मार्गस्थ करावा अशी मागणी केली. मात्र त्याला विश्वस्तांनी विरोध केल्याने ग्रामस्थांनी नगारा रथ अडवून धरला. वाढत्या नागरीकरणाचे व रस्त्याचे कारण विश्वस्तांनी दिले होते. सालाबादप्रमाणे उरळीकांचन शहरांमधून पालखी जावी व पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला.        ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादविवादानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला व नगाऱ्याला बैल जुंपण्यास सांगितले. ग्रामस्थांनी यावेळेस माणिक मोरे मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली. वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही.     पालखी विसावा महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर होणार होता यासाठी दर्शन मंडप सुद्धा टाकण्यात आला होता. त्याचप्रमाणे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. महात्मा गांधी महाविद्यालय मैदानावर पालखी विसावा मंडप उभारण्यात आला होता. त्यामुळे आम्ही लोक महामार्गावर गर्दी न करता महाविद्यालयाच्या मैदानावर गेलो होतो. परंतु पालखी विसाव्यासाठी न आल्याने आम्हाला दर्शन घेता आले नाही. यावर्षी आमचे पालखीचे दर्शन झाले नाही असे पंचक्रोशीतील नागरिक व महिलांनी सांगितले. 

...तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो    रात्री कदमवाक वस्ती येथे विश्वस्तांबरोबर चर्चा करून  सालाबाद प्रमाणे पालखी मार्ग ठेवावा यासाठी विनंती केली होती. परंतु बाकी विश्वतांपेक्षा माणिक मोरे यांनी विरोध केला व पंचक्रोशीतील भाविकांचे मन दुखावले आहे. एकट्याच्या या आडमुठेपणा धोरणामुळे वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली आहे. आमच्यामुळे जर वारकऱ्यांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. - उरुळी कांचन सरपंच अमित कांचन.

टॅग्स :Puneपुणेashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022Sant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळाuruli kanchanउरुळी कांचनPandharpurपंढरपूरsarpanchसरपंच