शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
3
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
4
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
5
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
7
Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन
8
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
9
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
10
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
11
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
12
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
13
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
14
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
15
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
16
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'
17
नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब
18
पाकिस्तानी नागरिकांनी ४८ तासांत भारत न सोडल्यास काय कारवाई होणार? असा आहे गुप्तचर यंत्रणांचा ॲक्शन प्लॅन   
19
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
20
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन

सावरकर कधीच 'स्वातंत्र्यवीर' नव्हते, राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेतली आहे का?- संभाजी ब्रिगेड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:36 IST

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जर विकृत भाषण करत असतील तर राज्यपाल पदावर किंवा देशातील कोणत्याही जबाबदार पदावर राहण्याचा अधिकार त्यांना ...

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी जर विकृत भाषण करत असतील तर राज्यपाल पदावर किंवा देशातील कोणत्याही जबाबदार पदावर राहण्याचा अधिकार त्यांना नाही. इतिहास काय आहे याचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे, खरा इतिहास पुढे आला पाहिजे. इतिहास खोट्या पद्धतीने मांडण्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कारस्थान लावलं आहे, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केला. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.

शिंदे पुढे म्हणाले, ३० नोव्हेंबरलला नाशिक येथे संभाजी ब्रिगेडचा मेळावा आहे, तिथं आम्ही महाराजांचं स्मारक याविषयी ही चर्चा करणार आहोत. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची हेळसांड केलेली चालणार नाही. 'मुद्द्याला मुद्दा अन् गुद्द्याला गुद्दा' हेच आमचं ब्रीदवाक्य आहे. 

राज ठाकरेंनी RSS ची सुपारी घेतली आहे का?

हर हर महादेव चित्रपटातून खोटा इतिहास, विकृती दाखवण्याचं काम आताच्या सरकारनं केलं आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन RSS चं काम करताहेत का? असा सवालही ब्रिगेडने केला. अनेक विषयांना ते स्वतः जातीय रंग देत असतात. जातीय दहशतवाद निर्माण करण्याचं काम राज ठाकरे यांनी केलेलं आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्रात दंगली घडल्या आहेत, असा आरोपही यावेळी संभाजी ब्रिगेडने यावेळी केला. 

"सावरकर स्वातंत्र्यवीर नव्हते"

सावरकर हे कधीही स्वातंत्र्यवीर नव्हतेच. लोकांनी त्यांना तसं दाखवलं. शिवसेना आणि आमच्यात या विषयावर कधीही वाद होणार नाहीत. त्यांचे विचार वेगळे आमचे विचार वेगळे आहेत. युती करतानाच यावर आमचं स्पष्ट बोलणं झालं आहे.

टॅग्स :PuneपुणेRaj Thackerayराज ठाकरेsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडMaharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ